शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२४ वाळूपट्ट्यांवर फेरतपासणीचा बडगा...

By admin | Updated: December 1, 2015 00:29 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५ वर्षांसाठी देण्यात आलेल्या २४ वाळूपट्ट्यांची फेरतपासणी करण्यासाठी गौण खनिज अधिकाऱ्यांसह तहसीलची पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५ वर्षांसाठी देण्यात आलेल्या २४ वाळूपट्ट्यांची फेरतपासणी करण्यासाठी गौण खनिज अधिकाऱ्यांसह तहसीलची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी जिल्ह्यातील खासगी जागांवरील २४ वाळूपट्टे ५ वर्षांसाठी देण्याचे करार करून दिले होते. त्या पट्ट्यांवर आता गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चार महिन्यांतच ते पट्टे फेरतपासणीच्या फेऱ्यात आले आहेत. वाळूपट्ट्यांचा लिलाव पर्यावरण समितीच्या कचाट्यात अडकल्यामुळे तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांमधून पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह न झाल्याने वाळूसाठे निर्माण होण्यावर त्याचा परिणाम झाला. जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना वाळूपट्ट्यांना परवानगी देण्यास पर्यावरण विभागाने नकार दिल्यामुळे २४ वाळूपट्टे वादात अडकले आहेत. या वाळूपट्ट्यांच्या विरोधात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून जिल्हा प्रशासनाने २४ वाळूपट्ट्यांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाळूपट्ट्यांच्या मालकांकडून दरमहा पावती पुस्तकाचा हिशेब सादर केला जात नाही. त्यांच्याकडे पाठविण्यात आलेले रेकॉर्ड रजिस्टर तपासणीसाठी गौणखनिज विभागाकडे दिले नाही. त्यामुळे या वाळूपट्ट्यातून नेमकी किती वाळू उपसण्यात आली याची माहिती मिळत नसल्याने त्या फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये फुलंब्रीमधील १, पैठणमधील १२, उर्वरित वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील वाळूपट्ट्यांचा समावेश आहे. वाळूपट्ट्यांतील उपशाची मोजदाद उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या तहसीलच्या पथकाद्वारे होईल. २४ वाळूपट्ट्यांची फेरतपासणी करण्यात येत असून गौणखनिज अधिकाऱ्यांसह तांत्रिक अधिकाऱ्यांचाही या पथकात समावेश करण्यात आला आहे.