शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 23:31 IST

लातूर : जिल्ह्यात विविध कारणांमुळे २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ वर्षांत ७९ गरोदर मातांचा मृत्यू झाला

लातूर : जिल्ह्यात विविध कारणांमुळे २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ वर्षांत ७९ गरोदर मातांचा मृत्यू झाला असून, त्यात २०१४-१५ मध्ये रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांवर मृत्यू ओढवला आहे तर अति रक्तस्त्राव झाल्याने १८.६ टक्के माता दगावल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या निरीक्षणामध्ये सरकारी व खासगी रुग्णालयांत गेल्या तीन वर्षांत एकूण ७९ गरोदर मातांवर मृत्यू ओढवला. २०१४-१५ मध्ये एकूण ५९ गरोदर माता दगावल्या. त्यात अति रक्तस्त्रावामुळे ११ मातांचा मृत्यू झाला. जंतू संसर्गामुळे ३ माता दगावल्या, तर गर्भपातामुळे २, बाळंतपणाला धोका झाल्याने १ तर रक्तदाबामुळे १४ आणि अन्य कारणांमुळे २७ अशा एकूण ५९ मातांचा मृत्यू झाला आहे. या सालात रक्तस्त्रावामुळे १८.६ टक्के, जंतू संसर्गामुळे ५.१ टक्के, गर्भपातामुळे ३.४, प्रसूतीला अडथळा १.७, रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांचा मृत्यू २०१४-१५ मध्ये झाला आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ७ गरोदर माता दगावल्या असून, त्यात अति रक्तस्त्रावामुळे २, जंतू संसर्गामुळे १ व अन्य कारणांमुळे ४ गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे. २०१५-१६ मध्ये १३ माता दगावल्या असून, त्यात अति रक्तस्त्रावामुळे ३, जंतू संसर्गामुळे १, अन्य कारणांमुळे ९ अशा एकूण १३ मातांवर मृत्यू ओढवला. या सालात रक्त स्त्रावामुळे ८.५ टक्के, जंतू संसर्गामुळे २.८ आणि अन्य कारणांमुळे २५.६ टक्के मृत्यूचे प्रमाण राहिले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी दिली. (प्रतिनिधी)