शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

३३६ पैकी २३४ पाणी नमुने दूषित

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

मोबीन खान ,वैजापूर भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या वैजापूर तालुक्यावर अस्मानीनंतर सुलतानी संकटही घोंगावत आहे. तालुक्यात सप्टेंबर ते जानेवारीदरम्यान तपासणी करण्यात

मोबीन खान ,वैजापूरभीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या वैजापूर तालुक्यावर अस्मानीनंतर सुलतानी संकटही घोंगावत आहे. तालुक्यात सप्टेंबर ते जानेवारीदरम्यान तपासणी करण्यात आलेल्या ३३६ पैकी २३४ पाणी नमुने दूषित आढळल्याने खळबळ उडाली आहे.सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या वैजापूर तालुक्याला यावर्षीही पावसाने दगा दिला. ऐन हिवाळ्यात तालुक्यातील विविध जलस्रोत आढळल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होत आहे. सदर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरचा उपाय शोधला जात आहे; परंतु या टँकरसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. तालुका आरोग्य विभागाकडून १५ सप्टेंबर ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान विविध भागातून ३३६ पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयात या पाण्याचे परीक्षण केले असता त्यातील २३४ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. सदर दूषित पाण्याचा अहवाल संबंधित विभागाला पाठविण्यात आल्याची माहिती कार्यालयीन सूत्रांनी दिली. या अहवालानंतरही प्रशासन ढिम्म असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याच्या विविध भागातून सध्या टँकरची मागणी वाढत आहे. अशा वेळी टँकर मंजूर करून देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत; परंतु सदर टँकरसाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची खातरजमा होताना दिसत नाही. पाणी पुरवठ्याच्या नावाखाली दूषित पाण्याचा पुरवठा करून प्रशासन आपले कोणते कर्तव्य पूर्ण करीत आहे हे समजायला मार्ग नाही. तालुक्यातील २६ गावांना ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर काही गावांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच या प्रस्तावांना मान्यताही मिळेल; परंतु या टँकरमधून होणारा पाणीपुरवठा सर्वसामान्यांसाठी धोकादायक ठरू नये यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. या प्रकरणी माहिती घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद हरबडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.