शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

३३६ पैकी २३४ पाणी नमुने दूषित

By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST

मोबीन खान ,वैजापूर भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या वैजापूर तालुक्यावर अस्मानीनंतर सुलतानी संकटही घोंगावत आहे. तालुक्यात सप्टेंबर ते जानेवारीदरम्यान तपासणी करण्यात

मोबीन खान ,वैजापूरभीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या वैजापूर तालुक्यावर अस्मानीनंतर सुलतानी संकटही घोंगावत आहे. तालुक्यात सप्टेंबर ते जानेवारीदरम्यान तपासणी करण्यात आलेल्या ३३६ पैकी २३४ पाणी नमुने दूषित आढळल्याने खळबळ उडाली आहे.सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या वैजापूर तालुक्याला यावर्षीही पावसाने दगा दिला. ऐन हिवाळ्यात तालुक्यातील विविध जलस्रोत आढळल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होत आहे. सदर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरचा उपाय शोधला जात आहे; परंतु या टँकरसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. तालुका आरोग्य विभागाकडून १५ सप्टेंबर ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान विविध भागातून ३३६ पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयात या पाण्याचे परीक्षण केले असता त्यातील २३४ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. सदर दूषित पाण्याचा अहवाल संबंधित विभागाला पाठविण्यात आल्याची माहिती कार्यालयीन सूत्रांनी दिली. या अहवालानंतरही प्रशासन ढिम्म असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याच्या विविध भागातून सध्या टँकरची मागणी वाढत आहे. अशा वेळी टँकर मंजूर करून देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत; परंतु सदर टँकरसाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची खातरजमा होताना दिसत नाही. पाणी पुरवठ्याच्या नावाखाली दूषित पाण्याचा पुरवठा करून प्रशासन आपले कोणते कर्तव्य पूर्ण करीत आहे हे समजायला मार्ग नाही. तालुक्यातील २६ गावांना ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर काही गावांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच या प्रस्तावांना मान्यताही मिळेल; परंतु या टँकरमधून होणारा पाणीपुरवठा सर्वसामान्यांसाठी धोकादायक ठरू नये यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. या प्रकरणी माहिती घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद हरबडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.