शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

२३ वर्षांनंतर विकास आराखड्याचे काम

By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST

औरंगाबाद : शहरात महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९१ मध्ये वाढीव हद्दीसाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला.

औरंगाबाद : शहरात महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९१ मध्ये वाढीव हद्दीसाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला. या आराखड्याला सुधारित करण्याचे काम तब्बल २३ वर्षांनंतर मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. कागदावरच तयार होणाऱ्या या आराखड्याचा प्रत्यक्ष काहीच उपयोग होणार नाही, हे विशेष.महापालिका हद्दीत झोपडपट्ट्या तयार होऊ नयेत, शहर चांगले विविध सुविधांयुक्त असावे या दृष्टीने शहर विकास आराखडा राबविण्यात येतो. या आराखड्यानुसार नागरिकांना रस्ते, मैदान, रुग्णालये, शाळा आदी मूलभूत सोयी-सुविधा दिल्या जातात. १९८२ मध्ये औरंगाबादेत महापालिका स्थापन करण्यात आली. त्यानंतर मनपाची हद्दही वाढविण्यात आली. या वाढीव हद्दीत १८ गावांचा समावेश करण्यात आला. शिवाय सिडकोतील २०५ हेक्टरचाही समावेश केला.महापालिकेने १९९१ मध्ये वाढीव हद्दीसाठी विकास योजना मंजूर केली. आता या विकास आराखड्यानुसार प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम नगररचना विभागाचे सहसंचालक म.रा. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. २० मे २०११ पासून औरंगाबादेत महापालिकेने बन्सीलालनगर येथे नगररचना विभागाचे एक स्वतंत्र कार्यालय तयार केले आहे. या कार्यालयात मागील काही वर्षांपासून प्रारूप विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. १ आॅगस्ट २०१४ रोजी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे प्रारूप विकास आराखड्याचे हस्तांतर करण्यात आले.