शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शहरात भविष्यात उभारतील २३ मजली इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:02 IST

शहरात भविष्यात उभारतील २३ मजली इमारती स्मार्ट सिटीच्या दिशेने : मनपा अग्निशमन दलास व्हावे लागेल सक्षम औरंगाबाद : आता ...

शहरात भविष्यात उभारतील २३ मजली इमारती

स्मार्ट सिटीच्या दिशेने : मनपा अग्निशमन दलास व्हावे लागेल सक्षम

औरंगाबाद : आता शहरात १० मजली इमारती दिसत आहेत; पण येत्या काळात या स्मार्ट सिटीत चक्क २३ मजली इमारती उभारल्या जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळेल, हे शक्य झाले आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या अधिसूचनामुळे या नियमावलीमुळे वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार असून, औरंगाबाद मनपा हद्दीत ७० मीटर उंचीपर्यंत म्हणजे २३ मजली इमारत बांधता येणार आहे. शहरात जुन्या इमारती पडून तिथे नव्या गगनचुंबी इमारती उभ्या राहतील. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे.

मुंबई, पुणे या मोठ्या शहरात आपण गगनचुंबी इमारती बघत असतो. तिथे फेरफटका मारून आलेल्या व्यक्तीस शहरतील इमारती ठेंगण्या वाटतात. आजघडीला शहरात १० मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, आता राज्यासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे येथील नामांकित बांधकाम व्यवसायिक २३ मजली इमारती बांधण्यासाठी सरसावले आहेत. त्यादृष्टीनं त्यांनी तयारी सुरू केली आहे. रेखांकनामधील ‘ॲमिनिटी स्पेसचे’ प्रमाण पाच टक्के इतके प्रस्तावित केले आहे. त्यामुळे बांधकामास जादा जागा उपलब्ध होणार आहे. जुन्या शहरतील ६० ते ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारती पडून तिथे या उंच इमारती उभारल्या जाणार आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करण्यात आला असल्याने असे प्रकल्प ‘रिडेव्हलपमेंट’ करता येतील. शहराबाहेरही अशा २३ मजली इमारती उभारल्या जातील.

यात एफएसआय जास्त मिळाल्याने फ्लॅटच्या किमती नियंत्रणात येतील. यामुळे येत्या काळात जर शहरात किंवा आसपासच्या भागात गगनचुंबी इमारती उभारलेल्या दिसल्या तर नवल वाटायला नको.

करावे लागतील आग प्रतिबंधक उपाय

आग प्रतिबंधक उपायाशिवाय मंजुरी नाही

इमारतीची उंची ७० मीटरपर्यंत वाढणार आहेत. मात्र, त्याच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापनचे नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणेच सर्व नियम पाळावे लागणार आहेत. त्याशिवाय बांधकामाचा नकाशा मंजूर होणार नाही.

चौकट

७० मीटरकरिता अग्निशमन दलास सक्षम होण्याची आवश्यकता

२३ मजली इमारतीला आग लागली तर त्या दृष्टीने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे उंच शिडी, अत्याधुनिक यंत्रणा, तेवढे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.

रवी वटटमवार

उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई