शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहरात भविष्यात उभारतील २३ मजली इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:02 IST

शहरात भविष्यात उभारतील २३ मजली इमारती स्मार्ट सिटीच्या दिशेने : मनपा अग्निशमन दलास व्हावे लागेल सक्षम औरंगाबाद : आता ...

शहरात भविष्यात उभारतील २३ मजली इमारती

स्मार्ट सिटीच्या दिशेने : मनपा अग्निशमन दलास व्हावे लागेल सक्षम

औरंगाबाद : आता शहरात १० मजली इमारती दिसत आहेत; पण येत्या काळात या स्मार्ट सिटीत चक्क २३ मजली इमारती उभारल्या जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळेल, हे शक्य झाले आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या अधिसूचनामुळे या नियमावलीमुळे वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार असून, औरंगाबाद मनपा हद्दीत ७० मीटर उंचीपर्यंत म्हणजे २३ मजली इमारत बांधता येणार आहे. शहरात जुन्या इमारती पडून तिथे नव्या गगनचुंबी इमारती उभ्या राहतील. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे.

मुंबई, पुणे या मोठ्या शहरात आपण गगनचुंबी इमारती बघत असतो. तिथे फेरफटका मारून आलेल्या व्यक्तीस शहरतील इमारती ठेंगण्या वाटतात. आजघडीला शहरात १० मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, आता राज्यासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे येथील नामांकित बांधकाम व्यवसायिक २३ मजली इमारती बांधण्यासाठी सरसावले आहेत. त्यादृष्टीनं त्यांनी तयारी सुरू केली आहे. रेखांकनामधील ‘ॲमिनिटी स्पेसचे’ प्रमाण पाच टक्के इतके प्रस्तावित केले आहे. त्यामुळे बांधकामास जादा जागा उपलब्ध होणार आहे. जुन्या शहरतील ६० ते ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारती पडून तिथे या उंच इमारती उभारल्या जाणार आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करण्यात आला असल्याने असे प्रकल्प ‘रिडेव्हलपमेंट’ करता येतील. शहराबाहेरही अशा २३ मजली इमारती उभारल्या जातील.

यात एफएसआय जास्त मिळाल्याने फ्लॅटच्या किमती नियंत्रणात येतील. यामुळे येत्या काळात जर शहरात किंवा आसपासच्या भागात गगनचुंबी इमारती उभारलेल्या दिसल्या तर नवल वाटायला नको.

करावे लागतील आग प्रतिबंधक उपाय

आग प्रतिबंधक उपायाशिवाय मंजुरी नाही

इमारतीची उंची ७० मीटरपर्यंत वाढणार आहेत. मात्र, त्याच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापनचे नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणेच सर्व नियम पाळावे लागणार आहेत. त्याशिवाय बांधकामाचा नकाशा मंजूर होणार नाही.

चौकट

७० मीटरकरिता अग्निशमन दलास सक्षम होण्याची आवश्यकता

२३ मजली इमारतीला आग लागली तर त्या दृष्टीने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे उंच शिडी, अत्याधुनिक यंत्रणा, तेवढे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.

रवी वटटमवार

उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई