शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यातील २२ पर्यटनस्थळांचा योजनांतून होणार कायापालट!

By admin | Updated: May 20, 2017 00:50 IST

जालना : पर्यटन क्लस्टर तयार करुन त्या अंतर्गत जिल्ह्यातील २२ तीर्थस्थळ वा पर्यटन केंद्राचा विकास करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पर्यटन क्लस्टर तयार करुन त्या अंतर्गत जिल्ह्यातील २२ तीर्थस्थळ वा पर्यटन केंद्राचा विकास करण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री यांनी नुकतीच अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली आहे. राज्या शासनाच्या विविध विभागांचा निधी यासाठी खर्च केला जाणार आहे. राज्यात जेथे पर्यटन केंद्र आहे त्या भागाचा गतीने विकास झालेला आपल्याला दिसून येतो. रोजगाराच्या संधीसह आर्थिक उलाढाल वाढीचे हे प्रमुख कारण आहे. पर्यटनावर जिल्ह्यातील नव्हे, तर राज्य, देशपातळीवर आणि परदेशी पाहुणेही भर देतात. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी पूरक वातावरण व्हावे, यादृष्टिने जिल्ह्यात पर्यटन क्लस्टर तयार करण्याचा निर्णय स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आहे. जाळीचा देव, राजूर, शंभू महादेव, नांगरतास, जांबसमर्थ, सूर्य मंदिर, वेद मंदिर, मत्स्योदरी मंदिर, रेणुका देवी आदी तीर्थस्थळ आणि पर्यटन केंद्रांचा यामध्ये अंतर्भाव आहे. स्थळांची यादी तयार करण्यात आली असून, स्थळानुसार प्राधान्यक्रम ठरवून त्या भागाच्या विकासासाठी पर्यटन, ग्रामीण विकास, जिल्हा नियोजन यासह विविध विभागांचा निधी खर्च केला जाणार आहे. यासाठी अर्थमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांसमवेत आपण बैठक करणार आहोत. त्या-त्या गावाच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करुन कालबद्ध कार्यक्रम राबविणार असल्याचे लोणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ग्रामविकास, पर्यटन मंत्रालय, जिल्हा नियोजन समितीचा निधी, आमदार, खासदार आणि विशेष उपक्रमांतर्गत निधी या गावांच्या विकासकामांसाठी वापरण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे लोणीकर यांनी यावेळी सांगितले.