शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

२२ रेशन दुकानदारांची अनामत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:25 IST

ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न करणे आणि लाभार्थ्यांचे आधार व्हेरीफिकेशन कमी केल्याचा फटका जिल्ह्यातील २२ रेशन दुकानदारांना बसला असून, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी या रेशन दुकानदारांच्या परवान्यापोटी जमा केलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न करणे आणि लाभार्थ्यांचे आधार व्हेरीफिकेशन कमी केल्याचा फटका जिल्ह्यातील २२ रेशन दुकानदारांना बसला असून, जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी या रेशन दुकानदारांच्या परवान्यापोटी जमा केलेली संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे़परभणी जिल्ह्यात मे महिन्यापासून सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य ई-पॉस मशीनच्या सहाय्याने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जिल्हा पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनचे तालुकानिहाय प्रशिक्षण रेशनदुकानदारांना दिले़ त्याचप्रमाणे २९ मार्च ते ४ एप्रिल या काळात ई-पॉस मशीन हाताळण्यासंदर्भात तांत्रिक अधिकाºयांमार्फत मार्गदर्शनही करण्यात आले़ ३० मे रोजीच्या पत्रानुसार तालुकानिहाय कार्यक्रम घेऊन लिंकवेल कंपनीच्या तांत्रिक अधिकाºयांनी सर्व ई-पॉस दुकानांतील मशीनचे प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षणही दिले़ त्यानंतर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करण्याचे बंधनकारक केले होते़ सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य वितरित करताना त्यात पारदर्शकता यावी, सर्व धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावे, या उद्देशाने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र त्यानंतरही काही रेशन दुकानदार ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करीत नसल्याची बाब पुरवठा अधिकाºयांच्या निदर्शनास आली़ त्यामुळे ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण न झाल्यास कारवाई करण्याचा पवित्रा पुरवठा विभागाने घेतला आहे़ त्याअंतर्गत पुरवठा विभागातील नायब तहसीलदारांकडून मिळालेल्या अहवालानुसार १० रेशन दुकानदारांनी सप्टेंबर महिन्यामध्ये ५० पेक्षा कमी ट्रान्झेक्शन केल्याचे निदर्शनास आले़ याचाच अर्थ किमान ५० लाभार्थ्यांनाही महिनाभरात ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरित केले नाही़ तसेच १२ रेशन दुकानदारांनी केलेले आधार व्हेरीफिकेशन हे शून्य असल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे २२ रेशन दुकानदारांनी अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयातील तरतुदींचा भंग केल्याचे स्पष्ट होत असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी २२ रेशन दुकानदारांची परवान्यापोटी जमा असलेली १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला असून, या पुढे अशा चुकांची पुनरावृत्ती करू नये, अशी ताकीद या दुकानदारांना दिली आहे़