शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१८ जागांसाठी २२९ नामनिर्देशनपत्र दाखल

By admin | Updated: September 3, 2015 00:17 IST

कळंब : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होवू घातलेल्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २२९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले़

कळंब : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होवू घातलेल्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २२९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले़ बाजार समितीचा संचालक होण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, पक्षाच्या पॅनलमधून जागा मिळावी, यासाठी अनेकांनी धावपळ सुरू केली आहे़कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक निवडीसाठी ११ आॅक्टोबर रोजी निवडणूक होत आहे़ निवडणूक प्रक्रियेतील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी तब्बल २२९ अर्ज दाखल झाले आहेत़ यात सेवा संस्था मतदार संघातील सर्वसाधारण ७ जागेसाठी ८०, इतर मागासवर्गीय संवर्गातील एका जागेसाठी ८, महिला प्रवर्गातील २ जागांसाठी १५, भटक्या जाती-जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी १२, उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण प्रवर्गाच्या २ जागांसाठी ४८, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी १२, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या एका जागेसाठी १० उमेदवारी अर्ज करण्यात आले आहेत़ व्यापारी मतदार संघातील २ जागांसाठी ३४ तर हमाल मापाडी मतदार संघातील ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ या अर्जांची छाननी झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे़ या प्रक्रीयेनंतर सर्व राजकीय पक्षही आपापले उमेदवार निश्चित करणार आहेत़ त्यामुळे अर्ज भरलेल्या इच्छुकांनी पक्षाच्या पॅनलमध्ये जागा मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे़ (वार्ताहर) महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमानुसार ज्या उमेदवाराकडे बाजार समितीचा व्यापारी परवाना आहे, त्या उमेदवाराचा तो ग्रामपंचायत किंवा सेवा संस्थेचा सदस्य असेल तरीही त्याला ग्रामपंचायत किंवा सेवा संस्थेच्या मतदार संघातून बाजार समितीची निवडणूक लढविता येणार नाही़ त्यामुळे उमेदवाराला व्यापारी मतदार संघातूनच निवडणूक लढवावी लागणार आहे़ त्यामुळे या निवडणुकीत व्यापारी व ग्रामपंचायत किंवा सेवा संस्था मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या तालुक्यातील सर्वच पक्षांच्या मातब्बर पुढाऱ्यांची इच्छा अपूर्णच राहणार असल्याचे चित्र आहे़ व्यापारी मतदार संघात दोनच जागा असल्याने या पुढाऱ्यांना यंदा प्रचाराची धुरा संभाळावी लागणार आहे़ हा नियम माहिती झाल्याने काहींनी नातेवाईकांची उमेदवारी दाखल केली आहे़ मात्र, ज्यांना नियम माहिती नाही त्यांना मात्र, मोठा फटका बसणार आहे़