शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जायकवाडीच्या मृतसाठ्यात २.१७ टीएमसीने वाढ

By admin | Updated: July 13, 2016 00:38 IST

पैठण : नाशिक विभागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे.

पैठण : नाशिक विभागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी जायकवाडी धरणात १०,१८५ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. दरम्यान, दारणा धरणातून सायंकाळी विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीतील पाण्याची आवक बुधवारपासून दुप्पट होण्याची शक्यता दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक विभागात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे दारणा आणि नांदूर मधमेश्वर धरणातून ३९,७६३ क्युसेक्स क्षमतेपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरणातूनही दुपारपासून ३१,८०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यास प्रारंभ झाला आहे. हे पाणी बुधवारी दुपारनंतर जायकवाडीत दाखल होणार असल्याने जायकवाडीतील आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तरीही या भागात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.जायकवाडीच्या मृतसाठ्यात २.१७ टीएमसी वाढ झाली आहे. सध्या धरणातील मृतसाठ्यात ५२७.७५३ दलघमी जलसाठा आहे. धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २१०.३४७ दलघमी पाणी लागणार आहे. वरील धरणातून येणारे पाणी लक्षात घेता धरणाचा मृतसाठा भरून निघेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकचे पाणी गोदावरीद्वारे मंगळवारी पहाटे नाथसागरात येऊन धडकले. सध्या गोदावरीतून पाणी १३,५८० क्युसेक्स क्षमतेने वाहत आहे.