शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जायकवाडीच्या मृतसाठ्यात २.१७ टीएमसीने वाढ

By admin | Updated: July 13, 2016 00:38 IST

पैठण : नाशिक विभागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे.

पैठण : नाशिक विभागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी जायकवाडी धरणात १०,१८५ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. दरम्यान, दारणा धरणातून सायंकाळी विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीतील पाण्याची आवक बुधवारपासून दुप्पट होण्याची शक्यता दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक विभागात मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे दारणा आणि नांदूर मधमेश्वर धरणातून ३९,७६३ क्युसेक्स क्षमतेपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरणातूनही दुपारपासून ३१,८०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यास प्रारंभ झाला आहे. हे पाणी बुधवारी दुपारनंतर जायकवाडीत दाखल होणार असल्याने जायकवाडीतील आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तरीही या भागात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.जायकवाडीच्या मृतसाठ्यात २.१७ टीएमसी वाढ झाली आहे. सध्या धरणातील मृतसाठ्यात ५२७.७५३ दलघमी जलसाठा आहे. धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २१०.३४७ दलघमी पाणी लागणार आहे. वरील धरणातून येणारे पाणी लक्षात घेता धरणाचा मृतसाठा भरून निघेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकचे पाणी गोदावरीद्वारे मंगळवारी पहाटे नाथसागरात येऊन धडकले. सध्या गोदावरीतून पाणी १३,५८० क्युसेक्स क्षमतेने वाहत आहे.