शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महामंडळाची २१ पदे रिक्त

By admin | Updated: June 23, 2014 00:04 IST

किनवट : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या किनवट येथील उपप्रादेशिक कार्यालयामार्फत आदिवासींच्या विविध विकासाच्या योजना राबवल्या जातात़ मात्र या कार्यालयात २४ पदे

किनवट : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या किनवट येथील उपप्रादेशिक कार्यालयामार्फत आदिवासींच्या विविध विकासाच्या योजना राबवल्या जातात़ मात्र या कार्यालयात २४ पदे मान्य असताना उपप्रादेशिक व्यवस्थापकासह २१ पदे रिक्तच असल्याने या कार्यालयाची भिस्त रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांवर आहे़रिक्त पदांमुळे विविध योजना राबवणे कठीण बनसल्याचे आदिवासी तालुक्यातील चित्र आहे़ कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने एकाधिकार धान्य खरेदी योजना धरसोड पद्धतीने राबवल्या जात असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादित माल व्यापाऱ्याच्या घशात जात आहे़आदिवासींच्या विकासाच्या योजना आदिवासी विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतात़ उपप्रादेशिक व्यवस्थापकासह उपव्यवस्थापक, लेखापाल, विपणन निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, रोखपाल व ग्रेडर यासह २१ पदे रिक्तच आहेत़ दोन कनिष्ठ लिपिक व एक जीप चालक व १६ रोजंदारी कर्मचाऱ्यांवरच या कार्यालयाचा कारभार सुरू आहे़ असे असतानाही तब्बल दोन वर्षानंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ३ कोटी रुपये किंमतीची तूर एकाधिकार खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आली़अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाणवा कायम असल्याने खावटी कर्ज, द्वारपोच योजना व एकाधिकार खरेदी योजनासह आदिवासी विकास महामंडळाच्या विविध योजनांना घरघर लागली आहे़ आदिवासींच्या विकासाच्या योजना राबवणाऱ्या या कार्यालयाकडे विशेषत: किनवट या आदिवासी तालुक्याकडे यंत्रणेडून दूर्लक्ष केले जात आहे़ एकाधिकार खरेदी योजना टीएसपी येरियातशासन दराप्रमाणे खरेदी करण्यासाठी महामंडळाची खरेदी चालविली जाते़ गत दोन वर्षापूर्वी तर ही खरेदी बंद होती़ यंदा मात्र ही खरेदी राबविली, पण केवळ तुरीशिवाय अन्य कोणत्याही मालाची खरेदी करण्यास महामंडळाला यश मिळाले नाही़ ज्वारी, मूग, उडीद, गहू, भुईमुग, गहू, चना या मालांची तर खरेदी झालीच नाही़ रिक्त पदांमुळे खावटी कर्ज वाटपावर परिणाम होत आहे़ कर्ज वाटपानंतर थकबाकी वसुली व्हावी, यासाठी प्रयत्नच होत नसल्याने थकबाकीदारांचा आकडा वाढूनच उद्दिष्ट घटत चालले आहे़स्वस्त धान्य वाटपात गडबड होवू नये, काळा बाजार होवू नये यासाठी महामंडळाच्या गाड्याद्वारे द्वारपोच योजना राबवून स्वस्त धान्य दारापर्यंत पोहचवण्याचे कार्य महामंडळाचे असताना नवीन गाड्यांचा पुरवठा नाही, भाडे तत्त्वावर गाड्या लावण्यास महामंडळ तत्पर असताना तहसीलच्या पुरवठा विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आदिवासी विकास महामंडळ सूत्रांनी व्यक्त केली़ सहा वर्षापूर्वी महामंडळाच्या गाड्याद्वारेच द्वारपोच धान्य पोहचविले जायचे़ पण त्यानंतर ही योजना बंदच पडली़ नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या किनवट येथील कार्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी आदिवासी जनतेकडून होत आहे़ (वार्ताहर)त्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काय? आदिवासी विकास महामंडळात गेल्या १५ ते २० वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत अजूनही कायम करून घेतले नाही़ ते आजही रोजंदारीवरच काम करतात़ त्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी होत आहे़