शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

साठवण तलावात २१ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: June 29, 2014 00:59 IST

एम़जी़मोमीन , जळकोट तालुक्यातील १२ साठवण तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे़ सध्या तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

एम़जी़मोमीन , जळकोटतालुक्यातील १२ साठवण तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे़ सध्या तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़ शिवाय, साठवण तलावावर शेतकऱ्यांनी बसविलेले मोटारीतून उपसा वाढल्याने दिवसेंदिवस पाण्यात मोठी घट होत आहे़ जळकोट तालुक्यातील निरगा, डोंगरगाव, सोनवळा, माळ हिप्परगा, हळद वाढवणा, चेरा (२), केकतसिंदगी, हावरगा, जंगमवाडी, घोणसी, गुप्ती (२), रावणकोळा आदी १२ साठवण तलावात तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस जास्त असल्याने १०० टक्के तलाव तुडूंब भरले होते़ या तलावातील पाण्यावर १५ ते २० गावांना पाणीपुरवठा केला जात आहे़ तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे़ ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी उपसा वाढविला आहे़ भर उन्हाळ्यात या साठवण तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाला आहे़ त्यामुळे तुंडुब असलेले साठवण तलाव अल्पावधीत तळाला गेले आहेत़ सध्या तालुक्यातील शंभर टक्के भरलेल्या साठवण तलावामध्ये केवळ २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पाणीपुरवठा उपविभाग वाढवण्याचे उपअभियंता व्ही़बी़सुळे यांनी सांगितले़दरवर्षी जळकोट तालुक्यात जून च्या पहिल्या आठवड्यात मृगाचा पाऊस पडतो़ त्यामुळे कोरडे पडलेल्या तलावात पुन्हा पाणीसाठा वाढत राहतो़; परंतु सध्या जून महिना संपत आला तरी तालुक्यावर पावसाचा एकही शितोडा पडला नाही़ त्यामुळे दिवसेंदिवस तलावातील पाणीसाठा कमी होत चालत असल्याचे दिसून येत आहे़ तालुक्यातील साठवण तलावावर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या मोटारी चालू असून आगामी काळात पाऊसाचे प्रमाण कमी झाल्यास भविष्यात तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ प्रशासनाने याची दखल घेवून तलावावरील मोटारी बंद कराव्यात अशी मागणी दत्ता घोणसीकर, रामेश्वर पाटील, रमेश पाटील, बालाजी तिडके यांच्यासह नागरिकांतून होत आहे़ प्रशासनाचे दुर्लक्ष़़़़तालुक्यातील १२ साठवण तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ या तलावातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे़ दिवसेंदिवस पाणीपातळीत मोठी घट होत आहे़ शेतकऱ्यांनी मोटारी लावून पाणी उपसा वाढविला असल्याने तलावांनी तळ गाठला आहे़ विशेष म्हणजे २० गावांना याच तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो़ पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे़ ढोरसांगवी तलावावरून जळकोट, कुणकी गावांना पाणीपुरवठा केला जातो़ या प्रकल्पातून पाणी संपल्यास दोन्ही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार, अशी परिस्थिती असतानाही प्रशासनाने पाणी उपसा करणाऱ्या मोटारींकडे दुर्लक्ष केले आहे़