शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

साठवण तलावात २१ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: June 29, 2014 00:59 IST

एम़जी़मोमीन , जळकोट तालुक्यातील १२ साठवण तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे़ सध्या तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

एम़जी़मोमीन , जळकोटतालुक्यातील १२ साठवण तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे़ सध्या तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़ शिवाय, साठवण तलावावर शेतकऱ्यांनी बसविलेले मोटारीतून उपसा वाढल्याने दिवसेंदिवस पाण्यात मोठी घट होत आहे़ जळकोट तालुक्यातील निरगा, डोंगरगाव, सोनवळा, माळ हिप्परगा, हळद वाढवणा, चेरा (२), केकतसिंदगी, हावरगा, जंगमवाडी, घोणसी, गुप्ती (२), रावणकोळा आदी १२ साठवण तलावात तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस जास्त असल्याने १०० टक्के तलाव तुडूंब भरले होते़ या तलावातील पाण्यावर १५ ते २० गावांना पाणीपुरवठा केला जात आहे़ तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे़ ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी उपसा वाढविला आहे़ भर उन्हाळ्यात या साठवण तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाला आहे़ त्यामुळे तुंडुब असलेले साठवण तलाव अल्पावधीत तळाला गेले आहेत़ सध्या तालुक्यातील शंभर टक्के भरलेल्या साठवण तलावामध्ये केवळ २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पाणीपुरवठा उपविभाग वाढवण्याचे उपअभियंता व्ही़बी़सुळे यांनी सांगितले़दरवर्षी जळकोट तालुक्यात जून च्या पहिल्या आठवड्यात मृगाचा पाऊस पडतो़ त्यामुळे कोरडे पडलेल्या तलावात पुन्हा पाणीसाठा वाढत राहतो़; परंतु सध्या जून महिना संपत आला तरी तालुक्यावर पावसाचा एकही शितोडा पडला नाही़ त्यामुळे दिवसेंदिवस तलावातील पाणीसाठा कमी होत चालत असल्याचे दिसून येत आहे़ तालुक्यातील साठवण तलावावर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या मोटारी चालू असून आगामी काळात पाऊसाचे प्रमाण कमी झाल्यास भविष्यात तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ प्रशासनाने याची दखल घेवून तलावावरील मोटारी बंद कराव्यात अशी मागणी दत्ता घोणसीकर, रामेश्वर पाटील, रमेश पाटील, बालाजी तिडके यांच्यासह नागरिकांतून होत आहे़ प्रशासनाचे दुर्लक्ष़़़़तालुक्यातील १२ साठवण तलावात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ या तलावातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे़ दिवसेंदिवस पाणीपातळीत मोठी घट होत आहे़ शेतकऱ्यांनी मोटारी लावून पाणी उपसा वाढविला असल्याने तलावांनी तळ गाठला आहे़ विशेष म्हणजे २० गावांना याच तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो़ पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे़ ढोरसांगवी तलावावरून जळकोट, कुणकी गावांना पाणीपुरवठा केला जातो़ या प्रकल्पातून पाणी संपल्यास दोन्ही गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार, अशी परिस्थिती असतानाही प्रशासनाने पाणी उपसा करणाऱ्या मोटारींकडे दुर्लक्ष केले आहे़