शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शिष्यवृत्तीचे २१ कोटी वाटप

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या माध्यमातून पात्र ठरलेल्यांपैकी तब्बल २० हजार २३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे

उस्मानाबाद : समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या माध्यमातून पात्र ठरलेल्यांपैकी तब्बल २० हजार २३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे २१ कोटी ८९ लाख ९१ हजार रुपये वाटप करण्यात आहेत. ही माहिती समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.भारत सरकार तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीचे दोन वर्षापासून ई- शिष्यवृत्तीमध्ये रूपांतर करण्यात आले. यात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदरील शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. यामध्ये शैक्षणिक साहित्य तसेच प्रवासखर्च कारणांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. सदरील शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येते. चालू वर्षी जिल्हाभरातील २०९ महाविद्यालयामधून २१ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी ई शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील २० हजार २३९ विद्यार्थ्यांच्या खात्यावर २१ कोटी ८९ लाख ९१ हजार रुपये शिष्यवृत्ती जमा केली असूृन, उर्वरित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समाज कल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, उर्वरित विद्यार्थ्यांनाही तातडीने शिष्यवृत्तीचे वाटप होणे आवश्यक आहे. तशी मागणीही लाभार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)