शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

जिल्ह्यात ‘एसटी’च्या २०२ फेऱ्या रद्द

By | Updated: December 9, 2020 04:01 IST

औरंगाबाद : भारत बंदमुळे मंगळवारी प्रवाशांनी लांबचा प्रवास टाळला. परिणामी, प्रवाशांअभावी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात ‘एसटी’च्या २०२ फेऱ्या ...

औरंगाबाद : भारत बंदमुळे मंगळवारी प्रवाशांनी लांबचा प्रवास टाळला. परिणामी, प्रवाशांअभावी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात ‘एसटी’च्या २०२ फेऱ्या रद्द झाल्या. मालवाहतूक करणाऱ्या २ हजार ट्रक जागेवरच उभ्या करण्यात आल्या. त्यामुळे मालवाहतुकीलाही फटका बसला. सिटी बसची प्रवासी संख्या नेहमीपेक्षा रोडावली होती. तर रिक्षा बंदला ६० टक्के रिक्षाचालकांनी प्रतिसाद दिला.

दिवाळीपासून एसटीला प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. परंतु मंगळवारी बस प्रवाशांअभावी रिकाम्याच धावत होत्या. मध्यवर्ती बसस्थानकात सकाळपासूनच शुकशुकाट होता. तुरळक प्रवासी पहायला मिळाले. ३ तास बस उभी राहूनही प्रवासी नव्हते. त्यामुळे बस रद्द करण्याची वेळ आल्याचे आगार व्यवस्थापक एस. ए. शिंदे यांनी सांगितले.

जालना रोडवर नेहमीप्रमाणे रिक्षांची वाहतूक सुरू होती. बंदच्या नावाखाली काही रिक्षाचालकांनी रेल्वेस्टेशनवरून शहरात जाणाऱ्या प्रवाशांकडून अधिक भाडे उकळले. त्याउलट सिटी बसला गर्दी कमी होती. सिटी बसला नेहमीपेक्षा अल्प प्रतिसाद राहिल्याचे स्मार्ट सिटी बसचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी सांगितले. भारत बंदला पाठिंबा म्हणून रिक्षाचालक संघटनांनीही बंद पुकारला होता. त्याला ६० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी सांगितले.

३८३ पैकी केवळ १८१ बस फेऱ्या

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात दुपारी ४ वाजेपर्यंत रोज ३८३ बस फेऱ्या होतात. परंतु मंगळवारी केवळ १८१ फेऱ्या झाल्या. तब्बल २०२ फेऱ्या रद्द झाल्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कंपन्यांचा कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत

शहरात रोज २५०० ट्रकद्वारे विविध मालाची वाहतूक होते. बंदमुळे बहुतांश जणांनी रस्त्यावर ट्रक आणण्याचे टाळले. दिवसभरात केवळ ५०० ट्रकची वाहतूक झाली. तब्बल २ हजार ट्रक आहे त्या ठिकाणीच उभ्या करण्यात आल्या. औरंगाबादेत येणाऱ्या ट्रक बीड, जळगाव, पुणे आदी ठिकाणी थांबविण्यात आल्या. त्यामुळे कंपन्यांना कच्च्या मालाचा पुरवठाही विस्कळीत झाला. औरंगाबादहून माल घेऊन रवाना होणाऱ्या ट्रक रात्री जाण्यास प्राधान्य दिल्याचे औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज खान यांनी सांगितले.