शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘एसटी’च्या २०२ फेऱ्या रद्द

By | Updated: December 9, 2020 04:01 IST

औरंगाबाद : भारत बंदमुळे मंगळवारी प्रवाशांनी लांबचा प्रवास टाळला. परिणामी, प्रवाशांअभावी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात ‘एसटी’च्या २०२ फेऱ्या ...

औरंगाबाद : भारत बंदमुळे मंगळवारी प्रवाशांनी लांबचा प्रवास टाळला. परिणामी, प्रवाशांअभावी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात ‘एसटी’च्या २०२ फेऱ्या रद्द झाल्या. मालवाहतूक करणाऱ्या २ हजार ट्रक जागेवरच उभ्या करण्यात आल्या. त्यामुळे मालवाहतुकीलाही फटका बसला. सिटी बसची प्रवासी संख्या नेहमीपेक्षा रोडावली होती. तर रिक्षा बंदला ६० टक्के रिक्षाचालकांनी प्रतिसाद दिला.

दिवाळीपासून एसटीला प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. परंतु मंगळवारी बस प्रवाशांअभावी रिकाम्याच धावत होत्या. मध्यवर्ती बसस्थानकात सकाळपासूनच शुकशुकाट होता. तुरळक प्रवासी पहायला मिळाले. ३ तास बस उभी राहूनही प्रवासी नव्हते. त्यामुळे बस रद्द करण्याची वेळ आल्याचे आगार व्यवस्थापक एस. ए. शिंदे यांनी सांगितले.

जालना रोडवर नेहमीप्रमाणे रिक्षांची वाहतूक सुरू होती. बंदच्या नावाखाली काही रिक्षाचालकांनी रेल्वेस्टेशनवरून शहरात जाणाऱ्या प्रवाशांकडून अधिक भाडे उकळले. त्याउलट सिटी बसला गर्दी कमी होती. सिटी बसला नेहमीपेक्षा अल्प प्रतिसाद राहिल्याचे स्मार्ट सिटी बसचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी सांगितले. भारत बंदला पाठिंबा म्हणून रिक्षाचालक संघटनांनीही बंद पुकारला होता. त्याला ६० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी सांगितले.

३८३ पैकी केवळ १८१ बस फेऱ्या

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात म्हणजे जिल्ह्यात दुपारी ४ वाजेपर्यंत रोज ३८३ बस फेऱ्या होतात. परंतु मंगळवारी केवळ १८१ फेऱ्या झाल्या. तब्बल २०२ फेऱ्या रद्द झाल्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कंपन्यांचा कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत

शहरात रोज २५०० ट्रकद्वारे विविध मालाची वाहतूक होते. बंदमुळे बहुतांश जणांनी रस्त्यावर ट्रक आणण्याचे टाळले. दिवसभरात केवळ ५०० ट्रकची वाहतूक झाली. तब्बल २ हजार ट्रक आहे त्या ठिकाणीच उभ्या करण्यात आल्या. औरंगाबादेत येणाऱ्या ट्रक बीड, जळगाव, पुणे आदी ठिकाणी थांबविण्यात आल्या. त्यामुळे कंपन्यांना कच्च्या मालाचा पुरवठाही विस्कळीत झाला. औरंगाबादहून माल घेऊन रवाना होणाऱ्या ट्रक रात्री जाण्यास प्राधान्य दिल्याचे औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज खान यांनी सांगितले.