शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

२०० कि.मी. अंतर १३ तासांत केले पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 20:27 IST

ध्येयवेड्या माणसांसमोर अशक्य गोष्टीही सहज शरण येतात. जिद्दीच्या बळावर ध्येयाने झपाटलेला माणूस म्हणजे सायकलपटू अभिजित बंगाळे. औरंगाबादेतील बंगाळे यांनी लहान मुलांसाठी असलेल्या २० इंची सायकलवरून १३ तासांत २०० किमी अंतर लीलया पार केले. छोट्या सायकलवरून हा लांबचा पल्ला गाठणारे बंगाळे हे मराठवाड्यातील पहिलेच सायकलपटू आहेत. त्यांच्या २० इंची सायकलवरील यशासमोर आकाशही ठेंगणे झाले आहे.

ठळक मुद्दे२० इंची सायकलसमोर आकाशही ठेंगणे : औरंगाबादच्या अभिजित बंगाळे यांच्या जिद्दीची कथा

जयंत कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ध्येयवेड्या माणसांसमोर अशक्य गोष्टीही सहज शरण येतात. जिद्दीच्या बळावर ध्येयाने झपाटलेला माणूस म्हणजे सायकलपटू अभिजित बंगाळे. औरंगाबादेतील बंगाळे यांनी लहान मुलांसाठी असलेल्या २० इंची सायकलवरून १३ तासांत २०० किमी अंतर लीलया पार केले. छोट्या सायकलवरून हा लांबचा पल्ला गाठणारे बंगाळे हे मराठवाड्यातील पहिलेच सायकलपटू आहेत. त्यांच्या २० इंची सायकलवरील यशासमोर आकाशही ठेंगणे झाले आहे.सात वर्षांपासून सायकल चालवण्याची आवड असलेल्या अभिजित बंगाळे यांनी लहान मुले चालवतात त्या २0 इंची उंचीच्या सायकलवर २00 कि.मी. अंतर पूर्ण करण्याचा निर्धार केला. तसे पाहता नॉर्मल सायकलची उंची ही साधारणत: २८ इंच असते. २0 इंच सायकल तयार करणाऱ्यांनी ही सायकल जास्तीतजास्त १0 कि.मी. अंतरच चालवू शकता, असे सांगितले;परंतु अभिजित बंगाळे यांनीआॅडेक्स इंडियातर्फे आयोजित२00 कि.मी. अंतर या छोट्याउंचीच्या सायकलवर पूर्ण करण्यास गुरुवारी सकाळी ६ वाजता क्रांती चौक येथून प्रारंभ केला. जाताना थंड हवा आणि पोषक वातावरणामुळे त्यांनी नगर जिल्ह्यातील टोलनाका सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी गाठला. परतीचा मार्ग मात्र क्षमतेचा कस घेणाराच होता.सायकल २0 इंच उंचीची असल्यामुळे सीट खाली करून चालवली, तर गुडघ्यावर प्रचंड ताण यायला लागला, तर सीट वर करून चालवली, तर पाठीवर ताण पडू लागला. त्यातच येताना वाहनांची प्रचंड वर्दळ. त्यासोबतच प्रचंड ऊन, विरुद्ध दिशेने वाहणारे वारे यांची तमा न बाळगता अभिजित बंगाळे यांनी जिद्दीच्या जोरावर छोट्या सायकलवरही २00 कि.मी. अंतर १३ तासांत पूर्ण करण्याची किमया साधली.सायंकाळी ७ वाजता ते क्रांती चौक येथे पोहोचले. विशेष म्हणजे आॅडेक्स इंडियातर्फे २00 कि.मी. अंतर हे साडेतेरा तासांत पूर्ण करायचे होते. मात्र, त्यांनी हे अंतर केवळ तेरा तासांतच पूर्ण केले. विशेष म्हणजे एनर्जिल व इलेक्ट्रॉल या ऊर्जा वाढवणाºया द्रव्यांचाही त्यांनी उपयोग केला नाही.भारतात २0 इंच उंचीच्या सायकलवर २00 कि.मी. अंतर पूर्ण करणारे जवळपास कोणीही नाही. आपण आता लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसाठी प्रयत्न करणार आहोत. याआधीही आपण २00, ४00 व ६00 कि.मी. अंतर हे सायकलवरून यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आता माझे लक्ष्य सायकलवरून १,000, १,२00, १,४00 कि.मी. अंतर पूर्ण करण्याचे आहे.- अभिजित बंगाळे (सायकलपटू)