शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

रस्त्यांसाठी २०० कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: October 4, 2016 00:48 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २०० कोटी रुपयांची गरज

औरंगाबाद : जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २०० कोटी रुपयांची गरज जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन व बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी व्यक्त केली आहे. उद्या मंगळवारी औरंगाबादेत मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. त्यावेळी संबंधित मंत्र्यांना यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. जिल्ह्यात ६ हजार ६८१ किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत. अलीकडच्या काळात या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी मिळणारा निधी हा अत्यंत खूप कमी असतो. त्यामुळे शासनाने यंदा किमान २०० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर करावा, अशी विनंती या प्रस्तावाद्वारे शासनाला करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मंजूर १८८ तीर्थक्षेत्रांचा विकास निधीअभावी रखडला आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून मागणीनुसार किमान २५ कोटी रुपये मंजूर करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेची सध्याची प्रशासकीय इमारत तब्बल ११० वर्षे जुनी आहे. इमारतीच्या डागडुजीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. प्रशासकीय इमारत उभारणीसाठी २००० साली उपकरातून १० कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजनही झाले होते. तथापि, उपकरातून एवढा मोठा निधी उपलब्ध न झाल्याने ते काम रेंगाळले. सध्याच्या इमारतीच्या जागेवर जुनी बांधकामे पाडून किंवा पाणचक्की रोडलगत असलेल्या जि. प. मालकीच्या जागेवर इमारत उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी ३० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. रस्त्यांबरोबर पुलांच्या दुरुस्तीची गरज आहे. जि. प. बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ८२ पुलांची तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसरीकडे १७ व १९ सप्टेंबर रोजी औरंगाबाद आणि फुलंब्री या दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली होती. पूर हानीमुळे रस्ते व पुलांची परिस्थिती वाईट झाली असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. शासनाने असे एकूण १० कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती अध्यक्ष महाजन व सभापती संतोष जाधव हे मंत्र्यांना करतील.