शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

२० छावण्यांना मंजुरी

By admin | Updated: August 26, 2015 23:47 IST

बीड : छावणी उभारण्याचा शासन निर्णय होऊन आठवडाभराचा कालावधी लोटत आला आहे तरी देखील बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष छावण्या उभारून

बीड : छावणी उभारण्याचा शासन निर्णय होऊन आठवडाभराचा कालावधी लोटत आला आहे तरी देखील बीड जिल्ह्यात प्रत्यक्ष छावण्या उभारून मुक्या जितराबांना चारा मिळालेला नाही. छावण्या वाटपात होत असलेल्या राजकारणामुळे जनावरांची तरफड सुरू आहे. आता तर छावण्या मंजुरीसाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या शिफारशींचा पाऊस सुरू असल्याचे चित्र महसूल प्रशासनात पहावयास मिळत आहे. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत २० छावण्यांना मंजुरी मिळाली आहे.जिल्ह्यात साडेनऊ लाखाच्या जवळपास लहान-मोठी जनावरे आहेत. चाऱ्याअभावी पशुमालक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने तात्काळ छावण्या सुरू करणे अपेक्षित होते. होत असलेल्या छावणी उभारणीच्या विलंबामुळे चाऱ्याअभावी जनावरांची तडफड सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शिरूर कासार तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क जनावरांचा चारा संपला म्हणून फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. एवढी भयाण परिस्थिती निर्माण झालेली असतानाही पुढाऱ्यांकडून छावणीत राजकारण होत आहे. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर छावणी मंजुरीसाठी दबाव आणला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.गाव एक शिफारस पत्र अनेककार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी मागेल त्या कार्यकर्त्याला नेत्याकडून शिफारस पत्र मिळत असल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. एका गावात एका ठिकाणी एक छावणी उभारण्यासाठी नेत्यांनी आपल्या दोन ते तीन कार्यकर्त्यांना पत्र दिलेले असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात पडले होते. यामध्ये बीड जिल्ह्यातील एका विद्यमान आमदाराने चक्क एका ठिकाणच्या छावणीमंजुरीसाठी दोन ते तीन जणांना पत्र दिले असल्याचे एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिफारस पत्रांचा हा पाऊस सुरू असल्याने कार्यकर्त्यांसमोर नेते उघडे पडत आहेत.कार्यकर्त्यांनाही आपल्या नेत्याचे आश्चर्य वाटत आहे. एका गावातून दोन ते तीन कार्यकर्त्यांना छावण्या सुरू करण्याचे शिफारसपत्र दिले असल्याने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चर्चेला उधाण आले होते. (प्रतिनिधी)गुरूवारी छावणीचे मंजूरीपत्र मिळाल्यानंतर प्रत्यक्ष चारा छावणी सुरू होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे चारा मिळण्यास अजून विलंब लागत असल्याने पशुमालक चिंतेत आहे.बुधवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतलेल्या बैठकीत २० छावण्यांना मंजुरी दिली आहे. यामध्ये आष्टी ४, बीड ३, पाटोदा २, शिरूर कासार १ यासह इतर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक अशा छावण्यांना मंजुरी दिली आहे. दरम्यान इतर तालुक्यांमधून देखील छावणी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत.ज्या संस्था छावणी चालविण्यास सक्षम आहेत त्यांनाच चारा छावणीची मंजूरी देण्यात येईल. दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन छावणीचालकांनीही कामामध्ये तत्परता दाखवावी. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे छावणी चालकांनी तंतोतंत पालन करणे आवश्य आहे. जे कोणी छावणी चालविताना नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. छावण्या तात्काळ सुरू करण्यात येतील.- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी