शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

मंत्रिमंडळ बैठकीवर धडकणार २० मोर्चे, २५० शिष्टमंडळे

By admin | Updated: October 4, 2016 00:54 IST

औरंगाबाद : मंगळवारी शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे सुमारे २० मोर्चे काढण्यात येणार आहेत

औरंगाबाद : मंगळवारी शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे सुमारे २० मोर्चे काढण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर २५० हून अधिक शिष्टमंडळे मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करणार आहेत. बैठकीसाठी शहरात राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या, ९ आयपीएस अधिकाऱ्यांसह सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा विविध ठिकाणी तैनात करण्यात आला. यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. २००८ नंतर प्रथमच मराठवाड्याच्या प्रश्नांवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत होत आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ शहरात दाखल होत आहे. यासोबत मंत्रालयातील प्रमुख अधिकारी, कर्मचारीही शहरात सोमवारीच दाखल झाले. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होत असून सुभेदारी विश्रामगृह येथे मुख्यमंत्री आपल्या सहकारी मंत्र्यांसह थांबणार आहेत. शिवाय चिकलठाणा विमानतळ ते सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा ताबा सोमवारी दुपारपासूनच पोलिसांनी घेतला. दोन दिवसांपासून या महत्त्वाच्या ठिकाणांची पोलीस, गुप्तचर संस्था, बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी केली जात आहे. या बैठकीच्या अनुषंगाने अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील सुमारे २५० वेगवेगळी शिष्टमंडळे मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन देणार आहेत. शिवाय मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीसह २० संघटनांकडून मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी दिली. आयुक्तालयाचा मार्ग बंदमंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने बरेच मोर्चे काढण्यात येणार आहेत. शिवाय निवेदने देण्यासाठीही नागरिकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर व्हीआयपींचा प्रवास विनाअडथळा व्हावा, यासाठी पोलिसांनी विभागीय आयुक्त, सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मार्ग वाहनांसाठी बंद केले आहेत. याविषयी वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीवर येणाऱ्या मोर्चांना आमखास मैदान येथे अडविण्यात येणार आहे. यामुळे आमखास (पान १ वरून) मैदान ते सुभेदारी विश्रामगृह, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग मंगळवारी बंद राहणार आहे. तर विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने हर्सूल कारागृहाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे येणारी सर्व वाहने उद्धवराव पाटील चौकात रोखली जाणार आहेत. उद्धवराव पाटील चौकापासून पुढे मार्ग बंद राहणार आहे.शहागंजकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्र्ग बंद ठेवण्यात येणार आहे. तर पंचायत समिती कार्यालयाकडून येणारी वाहने विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानासमोर अडविण्यात येतील. सुभेदारीत मंत्र्यांना भेटण्याची व्यवस्थामंत्रिमंडळ बैठकीनिमित्त शहरामध्ये सुमारे ३९ मंत्र्यांचा ताफा येत आहे. त्यामध्ये २३ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्र्यांचा समावेश असून, २० सचिव सोबत असतील. सुभेदारी विश्रामगृहातच दोन मोठे मंडप उभारण्यात आले असून, तेथे पासधारक नागरिकांना मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तथा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे सुभेदारीच्या मुख्यालयात थांबतील. पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी सकाळपासून बैठकीच्या तयारीचा पूर्ण आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची उपस्थिती होती. विभागीय आयुक्तालयातील मुख्य सभागृहात ६० जणांची आसन व्यवस्था बैठकीसाठी करण्यात आलेली आहे. कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे त्या बैठकीला लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता येणार नाही. तसेच आयुक्तालयाच्या परिसरात लोकप्रतिनिधींसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून, तेथे मुख्यमंत्री लोकप्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा करतील. दुपारी २ वा. स्वातंत्र्यसैनिकांना मुख्यमंत्री सुभेदारीत भेटतील. विविध संघटनांची १२५ निवेदने आलेली आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर परवानगी देण्यात आलेल्या मोर्चांसाठी तीन मार्ग देण्यात आले आहेत. असे असले तरी या सर्व मोर्चांचा शेवट आमखास मैदानावरच करण्यात येणार आहे. ४क्रांतीचौक येथून काही मोर्चे निघणार आहेत. हे सर्व मोर्चे सकाळी ११ वाजेनंतर निघतील आणि दुपारी २ ते ३ पर्यंत त्यांचा समारोप होईल.४क्रांतीचौकाकडून येणारे मोर्चे पैठणगेट, सिटीचौक, किलेअर्कमार्गे आमखास मैदानावर जातील. ४शहागंज येथील गांधी पुतळा येथून निघणारे मोर्चेही शहागंज, सराफा, सिटी चौक, सागर हॉटेलमार्गे किलेअर्ककडून आमखास मैदानावर पोहोचतील.४मिलकॉर्नरकडून येणारे मोर्चे थेट पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून टाऊन हॉल उड्डाणपूलमार्गे आमखास मैदान असे जातील. बंदोबस्तासाठी ९ अधीक्षक व उपायुक्त, ९६ पोलीस निरीक्षक, २०० सहायक निरीक्षक आणि फौजदार, २,७०० पोलीस कर्मचारी, राखीव दलाच्या चार तुकड्या, अतिशिघ्र कृती दलाच्या पाच तुकड्या, बॉम्बशोधक व नाशक विभागाची ८ पथके, गोपनीय शाखेचे कर्मचारी, स्थानिक पोलीस, दंगल काबू पथक, स्ट्रायकिंग फोर्स तसेच वज्रचा बंदोबस्तात समावेश करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली.