शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

२ हजार कोटी ‘पाण्यात’

By admin | Updated: September 20, 2015 01:12 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरिजा व अंजना नदीला आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले.

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरिजा व अंजना नदीला आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले. सिल्लोड, फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यांतील किमान ५० हजार हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट झालीत व हजारो हेक्टर शेतजमीन खंगाळून वाहून गेली. रस्ते, पूल वाहून गेले. किमान १५ बंधारे फुटले. दीड ते दोन हजार घरांची पडझड झाली व तेवढ्याच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. या अतिवृष्टीने दोन हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाने सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव, औरंगाबाद हे तालुके अधिक प्रभावित झाले. गिरिजा, दुधना, पूर्णा, सोना, अंजना, वाघिरा या नदीकाठावरील गावांचे पुरामुळे नुकसान झाले. त्यात गिरिजा, दुधना व सोना नद्यांमुळे अधिक नुकसान झाले. गिरिजा नदीवर ठिकठिकाणी बांधण्यात आलेले दहांहून अधिक बंधारे वाहून गेले आहेत. सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी- मूकपाठचा पाझर तलाव फुटला. औरंगाबाद तालुक्यातील देमणी शिवारातील सिमेंट बंधारा पुरात वाहून गेला. दुधना नदीचे पात्र पुराने फुगल्यामुळे औरंगपूर, शेलूदचाथा, लाडसावंगी आदी परिसरातील दहा गावांतील शेतपिकांवर गाळ अंथरला गेला. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. या गावांतील ४०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्या नागरिकांची घरे पुरात वाहून गेली आहेत. सिल्लोड तालुक्यात गुरुवारी १५७.८८ मि.मी., तर शुक्रवारी ६८.६३ मि.मी. असा २२६.५१ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यातील बनकिन्होळा, गेवराई सेमी, सोयगाव तालुक्यातील १०० च्या वर घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर ६० कुटुंबे बेघर झाली आहेत. बेघर झालेल्या कुटुंबांचे गावातीलच जि.प.च्या शाळेत स्थलांतर केले आहे. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. अतिवृष्टीमुळे नदीकाठी असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जवळपास ९०० हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन वाहून गेली आहे. अंदाजे २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असावीत. मका, बाजरी, कपाशी सोयाबीन पिके आडवी झाली आहेत. फुलंब्री तालुक्यात फुलमस्ता नदी तीरावरील गावांना नुकसान सहन करावे लागले. बोरगाव अर्ज गावाला पुराचा मोठा फटका बसला. भरून वाहणाऱ्या गिरिजा नदीच्या पात्राने ऐनवेळेस पात्र बदलल्याने शेकडो एकर शेतीवरील पिके वाहून गेली. सोयगाव तालुक्यात दोन दिवसांत २२४ मि.मी. पाऊस झाला. सोनानदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रालगतच्या गावातील घरांची पडझड झाली. या भागातून जनावरे व पिकेही वाहून गेली. सुदैवाने काहीही जीवित हानी झाली नाही. या पावसाने फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद व सोयगाव तालुक्यांतील बहुतांश मध्यम प्रकल्प व लघु तलाव, बांध-बंधारे, शेततळी भरली आहेत. दोघे मृत्युमुखीरामनदीला आलेल्या पुरात पुंडलिक शंकर कोलते (४८, रा. भालगाव, ता. फुलंब्री) व संजय सोमनाथ चव्हाण (३८, रा. भांडेगाव- सुलतानपूर, ता. खुलताबाद) हे अंजना नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. दोघांचे प्रेत शनिवारी सापडले.