शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

२ हजार कोटी ‘पाण्यात’

By admin | Updated: September 20, 2015 01:12 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरिजा व अंजना नदीला आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले.

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरिजा व अंजना नदीला आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले. सिल्लोड, फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यांतील किमान ५० हजार हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट झालीत व हजारो हेक्टर शेतजमीन खंगाळून वाहून गेली. रस्ते, पूल वाहून गेले. किमान १५ बंधारे फुटले. दीड ते दोन हजार घरांची पडझड झाली व तेवढ्याच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. या अतिवृष्टीने दोन हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाने सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव, औरंगाबाद हे तालुके अधिक प्रभावित झाले. गिरिजा, दुधना, पूर्णा, सोना, अंजना, वाघिरा या नदीकाठावरील गावांचे पुरामुळे नुकसान झाले. त्यात गिरिजा, दुधना व सोना नद्यांमुळे अधिक नुकसान झाले. गिरिजा नदीवर ठिकठिकाणी बांधण्यात आलेले दहांहून अधिक बंधारे वाहून गेले आहेत. सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी- मूकपाठचा पाझर तलाव फुटला. औरंगाबाद तालुक्यातील देमणी शिवारातील सिमेंट बंधारा पुरात वाहून गेला. दुधना नदीचे पात्र पुराने फुगल्यामुळे औरंगपूर, शेलूदचाथा, लाडसावंगी आदी परिसरातील दहा गावांतील शेतपिकांवर गाळ अंथरला गेला. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. या गावांतील ४०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्या नागरिकांची घरे पुरात वाहून गेली आहेत. सिल्लोड तालुक्यात गुरुवारी १५७.८८ मि.मी., तर शुक्रवारी ६८.६३ मि.मी. असा २२६.५१ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यातील बनकिन्होळा, गेवराई सेमी, सोयगाव तालुक्यातील १०० च्या वर घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर ६० कुटुंबे बेघर झाली आहेत. बेघर झालेल्या कुटुंबांचे गावातीलच जि.प.च्या शाळेत स्थलांतर केले आहे. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. अतिवृष्टीमुळे नदीकाठी असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जवळपास ९०० हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन वाहून गेली आहे. अंदाजे २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असावीत. मका, बाजरी, कपाशी सोयाबीन पिके आडवी झाली आहेत. फुलंब्री तालुक्यात फुलमस्ता नदी तीरावरील गावांना नुकसान सहन करावे लागले. बोरगाव अर्ज गावाला पुराचा मोठा फटका बसला. भरून वाहणाऱ्या गिरिजा नदीच्या पात्राने ऐनवेळेस पात्र बदलल्याने शेकडो एकर शेतीवरील पिके वाहून गेली. सोयगाव तालुक्यात दोन दिवसांत २२४ मि.मी. पाऊस झाला. सोनानदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रालगतच्या गावातील घरांची पडझड झाली. या भागातून जनावरे व पिकेही वाहून गेली. सुदैवाने काहीही जीवित हानी झाली नाही. या पावसाने फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद व सोयगाव तालुक्यांतील बहुतांश मध्यम प्रकल्प व लघु तलाव, बांध-बंधारे, शेततळी भरली आहेत. दोघे मृत्युमुखीरामनदीला आलेल्या पुरात पुंडलिक शंकर कोलते (४८, रा. भालगाव, ता. फुलंब्री) व संजय सोमनाथ चव्हाण (३८, रा. भांडेगाव- सुलतानपूर, ता. खुलताबाद) हे अंजना नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. दोघांचे प्रेत शनिवारी सापडले.