शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव बोगद्यासाठी २ पर्याय

By admin | Updated: April 24, 2016 00:17 IST

औरंगाबाद : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात येणार आहे. या बोगद्याचे डिझाईन तयार करण्याचे कंत्राट स्वित्झर्लंड येथील अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग कंपनीला दिले असून, या कंपनीने बोगद्यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कंपनीचे अधिकारी व इंजिनिअर घाटाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शहरात येणार आहेत. सोलापूर- धुळे या ४५२ कि. मी. च्या राष्ट्रीय महामार्गातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कन्नडजवळील चाळीसगाव घाट होय. येथील डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. बोगद्याचे डिझाईन तयार करण्याचे कंत्राट राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय) ने स्वित्झर्लंडच्या अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग कंपनीला दिले. डिसेंबर महिन्यात हे काम देण्यात आले होते. या कंपनीने घाट तयार करण्यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. एका पर्यायामध्ये ४ कि. मी. चा बोगदा असेल तर २ कि. मी.चा उड्डाणपुलाचा रस्ता अभयारण्यातून जाईल, यामुळे झाडांची तोड मोठ्या प्रमाणात करावी लागेल. यासाठी आणखी ३ कि. मी. चा मार्ग वाढवून १० कि. मी. चा घाट करण्याचे सुचविण्यात आले आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये रस्त्याच्या खालून बोगदा तयार केल्यास अभयारण्याचे कोणतेच नुकसान होणार नाही, हे सुचविण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पर्यायांवर विचारमंथन करण्यासाठी एनएचएआयची बैठक दिल्ली येथे २६ ते २८ एप्रिलदरम्यान होणार आहे. पहिला पर्याय...पूर्वीच्या डिझाईननुसार भांबरवाडी येथून जाणारा बोगदा ७ कि. मी. लांबीचा होता. यात २ कि. मी. च्या पुलाचा समावेश होता.या पुलासाठी गौताळा अभयारण्यात चार मोठे पिलर उभारावे लागतील. अभयारण्यातील हानी टाळण्यासाठी कंपनीने बोगद्याची लांबी आणखी ३ कि. मी. ने वाढवावी, असे सुचविले आहे. म्हणजे १० कि. मी. चा बोगदा होईल. दुसरा पर्याय...सध्या घाटातून वाहतूक जाते त्या रस्त्याखालून बोगदा खोदण्यात येऊ शकतो. रस्त्याच्या १५० ते ३०० फूट खालून बोगदा जाईल. डोंगरातूनच संपूर्ण बोगदा जाणार असल्याने अभयारण्याची कोणतीच हानी होणार नाही, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हा बोगदा १० ते ११ कि. मी. लांबीचा होऊ शकतो. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एनएचएआयचे अधिकारी, अ‍ॅम्बर्ग कंपनीचे अधिकारी व इंजिनिअर प्रत्यक्षात घाटाची पाहणी करण्यासाठी शहरात येणार आहेत. यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीनुसार घाटातील बोगद्याचे अंतिम डिझाईन तयार केले जाईल. त्याच वेळी बोगदा तयार करण्यासाठी निविदा काढण्याचे कामही कंपनी करणार आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ६ महिन्यांत कंपनी डिझाईन तयार करणार आहे.