शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

चाळीसगाव बोगद्यासाठी २ पर्याय

By admin | Updated: April 24, 2016 00:17 IST

औरंगाबाद : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात येणार आहे. या बोगद्याचे डिझाईन तयार करण्याचे कंत्राट स्वित्झर्लंड येथील अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग कंपनीला दिले असून, या कंपनीने बोगद्यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कंपनीचे अधिकारी व इंजिनिअर घाटाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शहरात येणार आहेत. सोलापूर- धुळे या ४५२ कि. मी. च्या राष्ट्रीय महामार्गातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कन्नडजवळील चाळीसगाव घाट होय. येथील डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. बोगद्याचे डिझाईन तयार करण्याचे कंत्राट राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय) ने स्वित्झर्लंडच्या अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग कंपनीला दिले. डिसेंबर महिन्यात हे काम देण्यात आले होते. या कंपनीने घाट तयार करण्यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. एका पर्यायामध्ये ४ कि. मी. चा बोगदा असेल तर २ कि. मी.चा उड्डाणपुलाचा रस्ता अभयारण्यातून जाईल, यामुळे झाडांची तोड मोठ्या प्रमाणात करावी लागेल. यासाठी आणखी ३ कि. मी. चा मार्ग वाढवून १० कि. मी. चा घाट करण्याचे सुचविण्यात आले आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये रस्त्याच्या खालून बोगदा तयार केल्यास अभयारण्याचे कोणतेच नुकसान होणार नाही, हे सुचविण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पर्यायांवर विचारमंथन करण्यासाठी एनएचएआयची बैठक दिल्ली येथे २६ ते २८ एप्रिलदरम्यान होणार आहे. पहिला पर्याय...पूर्वीच्या डिझाईननुसार भांबरवाडी येथून जाणारा बोगदा ७ कि. मी. लांबीचा होता. यात २ कि. मी. च्या पुलाचा समावेश होता.या पुलासाठी गौताळा अभयारण्यात चार मोठे पिलर उभारावे लागतील. अभयारण्यातील हानी टाळण्यासाठी कंपनीने बोगद्याची लांबी आणखी ३ कि. मी. ने वाढवावी, असे सुचविले आहे. म्हणजे १० कि. मी. चा बोगदा होईल. दुसरा पर्याय...सध्या घाटातून वाहतूक जाते त्या रस्त्याखालून बोगदा खोदण्यात येऊ शकतो. रस्त्याच्या १५० ते ३०० फूट खालून बोगदा जाईल. डोंगरातूनच संपूर्ण बोगदा जाणार असल्याने अभयारण्याची कोणतीच हानी होणार नाही, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हा बोगदा १० ते ११ कि. मी. लांबीचा होऊ शकतो. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एनएचएआयचे अधिकारी, अ‍ॅम्बर्ग कंपनीचे अधिकारी व इंजिनिअर प्रत्यक्षात घाटाची पाहणी करण्यासाठी शहरात येणार आहेत. यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीनुसार घाटातील बोगद्याचे अंतिम डिझाईन तयार केले जाईल. त्याच वेळी बोगदा तयार करण्यासाठी निविदा काढण्याचे कामही कंपनी करणार आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ६ महिन्यांत कंपनी डिझाईन तयार करणार आहे.