शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

चाळीसगाव बोगद्यासाठी २ पर्याय

By admin | Updated: April 24, 2016 00:17 IST

औरंगाबाद : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात येणार आहे. या बोगद्याचे डिझाईन तयार करण्याचे कंत्राट स्वित्झर्लंड येथील अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग कंपनीला दिले असून, या कंपनीने बोगद्यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कंपनीचे अधिकारी व इंजिनिअर घाटाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शहरात येणार आहेत. सोलापूर- धुळे या ४५२ कि. मी. च्या राष्ट्रीय महामार्गातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कन्नडजवळील चाळीसगाव घाट होय. येथील डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. बोगद्याचे डिझाईन तयार करण्याचे कंत्राट राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय) ने स्वित्झर्लंडच्या अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग कंपनीला दिले. डिसेंबर महिन्यात हे काम देण्यात आले होते. या कंपनीने घाट तयार करण्यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. एका पर्यायामध्ये ४ कि. मी. चा बोगदा असेल तर २ कि. मी.चा उड्डाणपुलाचा रस्ता अभयारण्यातून जाईल, यामुळे झाडांची तोड मोठ्या प्रमाणात करावी लागेल. यासाठी आणखी ३ कि. मी. चा मार्ग वाढवून १० कि. मी. चा घाट करण्याचे सुचविण्यात आले आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये रस्त्याच्या खालून बोगदा तयार केल्यास अभयारण्याचे कोणतेच नुकसान होणार नाही, हे सुचविण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पर्यायांवर विचारमंथन करण्यासाठी एनएचएआयची बैठक दिल्ली येथे २६ ते २८ एप्रिलदरम्यान होणार आहे. पहिला पर्याय...पूर्वीच्या डिझाईननुसार भांबरवाडी येथून जाणारा बोगदा ७ कि. मी. लांबीचा होता. यात २ कि. मी. च्या पुलाचा समावेश होता.या पुलासाठी गौताळा अभयारण्यात चार मोठे पिलर उभारावे लागतील. अभयारण्यातील हानी टाळण्यासाठी कंपनीने बोगद्याची लांबी आणखी ३ कि. मी. ने वाढवावी, असे सुचविले आहे. म्हणजे १० कि. मी. चा बोगदा होईल. दुसरा पर्याय...सध्या घाटातून वाहतूक जाते त्या रस्त्याखालून बोगदा खोदण्यात येऊ शकतो. रस्त्याच्या १५० ते ३०० फूट खालून बोगदा जाईल. डोंगरातूनच संपूर्ण बोगदा जाणार असल्याने अभयारण्याची कोणतीच हानी होणार नाही, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हा बोगदा १० ते ११ कि. मी. लांबीचा होऊ शकतो. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एनएचएआयचे अधिकारी, अ‍ॅम्बर्ग कंपनीचे अधिकारी व इंजिनिअर प्रत्यक्षात घाटाची पाहणी करण्यासाठी शहरात येणार आहेत. यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीनुसार घाटातील बोगद्याचे अंतिम डिझाईन तयार केले जाईल. त्याच वेळी बोगदा तयार करण्यासाठी निविदा काढण्याचे कामही कंपनी करणार आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ६ महिन्यांत कंपनी डिझाईन तयार करणार आहे.