शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

१९ साठवण तलाव ‘फुल्ल’

By admin | Updated: September 3, 2014 01:09 IST

उस्मानाबाद : सलग दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेखाली असणारा जिल्ह्याला मागील चार ते पाच दिवसांत झालेल्या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबाद : सलग दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेखाली असणारा जिल्ह्याला मागील चार ते पाच दिवसांत झालेल्या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मागील चार ते पाच वर्षांत जिल्ह्यात भर पावसाळयात टँकरची संख्या शंभरावर होती मात्र आता टँकर संख्या तीनवर आली आहे. तसेच पाच तालुक्यांतील १९ तलाव हे शंभर टक्के भरले आहेत.जुलै महिना उजाडला तरी पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट आले होते. जुलै महिन्यात टँकरची संख्या शंभरावर होती. मात्र त्यानंतर आॅगस्ट महिन्यात काही तालुक्यात पाऊस झाल्याने ही संख्या ७२ झाली तर विहीर व बोअरचे अधिग्रहणांची संख्याही ४६० झाली. मात्र आॅगस्ट महिन्यांच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या पावसाने टँकरची संख्या तीन तर अधिग्रहणांची संख्या ७ आहे. सद्य:स्थितीत भूम तालुक्यातील एक गाव व चार वाड्यावर दोन टँकरने पाणीपुरवठा तसेच दोन ठिकाणी अधिग्रहण करण्यात आले आहे. परंडा तालुक्यात एका टँकरने एका गावात पाणीपुरवठा व तीन गावांत पाच ठिकाणी अधिग्रहण करुन प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याने विहिरी, विंधन विहीरीची पाणी पातळी कमालीची घट झालेली होती. यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता. मात्र आॅगस्ट महिन्यात शेवटच्या आठवडयात जिल्ह्याच्या विविध भागात जोराचा पाऊस झाल्याने या भागात विविध प्रकल्पातील पाणीसाठा चांगलाच वाढल्याने उस्मानाबाद जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, कळंब व लोहारा हे पाच तालुके सद्यस्थितीत टँकरमुक्त झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.