शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

१९५२ ते २०१९ नॉनस्टॉप मतदान; भुजंगराव कुलकर्णी यांचा अनोखा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:44 IST

नवमतदारांना मतदान करण्याचे केले आवाहन

- राम शिनगारे 

औरंगाबाद : देशात संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९५२ साली लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते मंगळवारी (दि.२३) झालेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत सेवानिवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

१९५२ पासून आजपर्यंत देशात लोकसभेच्या १७ निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीच्या वेळी भुजंगराव कुलकर्णी हे हैदराबादेत नोकरीनिमित्त होते. त्याठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यानंतर १९५७ साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी भुजंगराव कुलकर्णी औरंगाबादचे जिल्हाधिकारी होते. त्यामुळे औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघातील निवडणूक त्यांच्या नेतृत्वातच पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने त्या निवडणुकीत सर्व मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकडे सर्वाधिक लक्ष दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याचे ते सांगतात.

मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. आपला तो हक्क आहे. हा हक्क बजावणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावला. १७ व्या लोकसभेसाठी मंगळवारी सकाळीच कुटुंबियांसह बाबा पेट्रोलपंप परिसरातील मतदान  केंद्रावर दाखल होत हक्क बजावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून इतरही दिग्गजांच्या प्रचारसभांचा धुराळा उडत असताना त्यांच्या संरक्षण, नियोजनाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. आयएएस अधिकारी असल्यामुळे मतदान यंत्रणेची जबाबदारीही अनेक वेळा पार पाडावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

मतदानाने लोकशाही बळकट होते भारतीय लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपली लोकशाही मजबूत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी असल्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाशिवाय लोकशाहीला बळकटी येणे शक्य नाही. यामुळे १९५२ ते २०१९ या कालावधीत झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी न चुकता मतदान केले.- भुजंगराव कुलकर्णी, आयएएस अधिकारी, सेवानिवृत्त

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019