शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

१९४ बदल्या समानीकरणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:18 IST

जिल्हा परिषदेच्या संवर्ग भाग १ व २ च्या शिक्षकांच्या खो बदल्या झाल्यानंतर त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील काही शिक्षकांना या विभागातील स्थानिक अधिकाºयांच्या चुकांमुळे आणखी मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. समानीकरणात अतिरिक्त ठरलेल्या १९४ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ झाल्याची तक्रार केल्यानंतर अधिकाºयांनीही चूक कबूल केल्याने शिक्षकांनी सोमवारी जि.प.त तीव्र संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या संवर्ग भाग १ व २ च्या शिक्षकांच्या खो बदल्या झाल्यानंतर त्रस्त झालेल्या जिल्ह्यातील काही शिक्षकांना या विभागातील स्थानिक अधिकाºयांच्या चुकांमुळे आणखी मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. समानीकरणात अतिरिक्त ठरलेल्या १९४ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ झाल्याची तक्रार केल्यानंतर अधिकाºयांनीही चूक कबूल केल्याने शिक्षकांनी सोमवारी जि.प.त तीव्र संताप व्यक्त केला.राज्य शासनाच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीच्या धोरणानुसार संवर्ग भाग १ व भाग २ मधील ३०४ शिक्षकांच्या २२ सप्टेंबर रोजी खो बदल्या झाल्या होत्या. यामध्ये १९४ शिक्षकांच्या समानीकरणांतर्गत बदल्या झाल्या. समानीकरणांतर्गत बदल्या करीत असताना स्थानिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षण अधिकाºयांनी पारदर्शकता न ठेवता पूर्वग्रह दूषित पद्धतीने या बदल्या केल्याची तक्रार सोमवारी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्याकडे केली. तत्पूर्वी जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या उपस्थितीत नखाते यांच्या कक्षामध्ये शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीत शिक्षकांनी शिक्षण विभागातील दोन्ही अधिकाºयांना चुकीच्या कार्यपद्धतीबद्दल जाब विचारुन धारेवर धरले. यावेळी या अधिकाºयांकडून चूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्व शिक्षक, उपाध्यक्षा नखाते, शिक्षणाधिकारी गरुड, गटशिक्षणाधिकारी भुसारे हे सीईओं सवडे यांच्या कक्षात दाखल झाले. यावेळी सवडे यांच्यासमोर शिक्षकांनी या प्रक्रियेबद्दल संताप व्यक्त करुन अनेक अनियमितता त्यांच्यासमोर मांडल्या. समानीकरणात अतिरिक्त ठरणारी पदे २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे निश्चित करावयाला पाहिजे होती, ही अतिरिक्त पदे तालुकापातळीवर करण्यात आल्याने पूर्वग्रह दूषितपणे ती ठरविण्यात आली आहेत. अनेक तालुक्यात चुकीच्या पद्धतीने ही प्रक्रिया झाली आहे. १२ सप्टेंबर २०१७ च्या शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार शिक्षकांचे समायोजन करायला पाहिजे होते; परंतु, काही शाळांमध्ये वरिष्ठ शिक्षकांना अभय देत कनिष्ठ शिक्षकांना बळीचा बकरा करण्यात आले आहे. ज्या मोठ्या शाळांवर प्राथमिक शिक्षकांची तीन पदे आहेत, तेथे दोन किंवा एक पदे अगोदरच रिक्त आहेत. अशा पदांचे समानीकरण न करता या जागा मोकळ्या सोडून भरपूर विद्यार्थी असलेल्या शाळांवर तीन पैकी २ पदे अतिरिक्त ठरवून समानीकरण झाले आहे. ज्या शाळेत ६ ते ८ पटसंख्या दहाच्या आत आहे, त्या शाळांवर दोन- दोन पदवीधर शिक्षक कार्यरत ठेवले आहेत. समानीकरण करताना तीन-तीन पदवीधर असलेल्या व कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचा प्राधान्याने विचार करायला हवा होता. मात्र तो न करता बहुसंख्य विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा समानीकरणाच्या बळी ठरल्या आहेत. परिणामी शिक्षकांवरही मोठा अन्याय होत असल्याची भावना आहे. काही मर्जीतील शिक्षकांना सांभाळण्यासाठी इतर शिक्षकांवर अन्याय केल्याचा आरोपही यावेळी शिक्षकांनी केला.यावेळी झालेल्या चर्चेत जि.प. उपाध्यक्षा नखाते यांनीही शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून चूक झाल्याचे सांगितले. गटशिक्षणाधिकारी भूसारे यांनी आपल्याकडे कर्मचाºयांची कमतरता असल्याने शिक्षकांकडून ही कामे करुन घेण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी चुका झाल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी गरुड यांनी मात्र नियमानेच काम केल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे त्या निरुत्तर झाल्या. या सर्व शिक्षकांचे म्हणणे सीईओं सवडे यांनी ऐकून घेतले व त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे सांगून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा काढून मार्ग काढूत, असे आश्वासन दिले. त्यानंतर शिक्षक शांत झाले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर कदम, कार्याध्यक्ष रामराव रोकडे, सरचिटणीस दिलीप श्रृंगारपुतळे, अरुण चव्हाळ, रुस्तुम शेख, किशन इदगे, व्ही.एम.जाधव, कैलास सुरवसे, दीपक शिंदे, गंगाधर चिंचाणे, विनोद लांडगे, किशन तुपसागर, दत्ता गायकवाड, माणिक घाटूळ, संजय चिंचाणे आदी शिक्षकांची उपस्थिती होती.