शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

२६ दिवसांत १९२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज दीड ते दोन हजार नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यातच मृत्यूची संख्याही ...

औरंगाबाद : कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज दीड ते दोन हजार नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यातच मृत्यूची संख्याही मागील दोन दिवसांपासून अफाट वाढली आहे. १८ ते २१ रुग्णांचा दररोज मृत्यू होत आहे. मार्च महिन्याला अजून तीन दिवस शिल्लक असले तरी मृत्यूची संख्या महिनाभरात तब्बल १९२ पर्यंत पोहोचली आहे. ही आकडेवारी एकट्या शहरातली आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्याही या महिन्यात बरीच वाढलेली आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून प्रशासनाने मागील महिनाभरात सर्व उपाययोजना केल्या. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी प्रशासनाला ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्याचा कठोर निर्णय शनिवारी घ्यावा लागला. या निर्णयामुळे कोरोनाची साखळी ब्रेक होण्यासाठी मदत होईल, असा कयास प्रशासनाचा आहे. पॉझिटिव्ह आलेले आणि गंभीर असलेले रुग्ण सध्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. मागील दोन दिवसांत मृत्यूचे आकडे थक्क करणारे आहेत. शुक्रवारी १८ तर शनिवारी २१ नागरिकांचा मृत्यू झाला. १ ते २६ मार्चपर्यंत शहरातील १९२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १६ ते २६ या दहा दिवसांमध्ये तब्बल १६० नागरिकांचा मृत्यू झाला हे धक्कादायक.

वर्षभरात सर्वाधिक मृत्यू मार्चमध्ये

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाली होती. जून २०२० मध्ये सर्वाधिक १९१ नागरिकांचा मृत्यू झाला होता. जुलै २०२० मध्ये १६९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा ३१ मार्चपर्यंत आणखी मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

संशयित रुग्णांनी तपासण्या वेळेवर कराव्यात

ताप, सर्दी, खोकला असेल तर नागरिकांनी आजार अंगावर काढू नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तपासणी करून घ्यावी. वेळेवर उपचार मिळाले तर रुग्णांना वाचविणे थोडेफार शक्य होते, असे महापालिकेतील आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.