शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

खत, बियाणे विक्रीवर राहणार १९ पथकांची नजर

By admin | Updated: June 2, 2014 00:51 IST

उस्मानाबाद : खरीप पेरणीपूर्व मशागतीचे कामे उरकली असून शेतकरी आता बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.

उस्मानाबाद : खरीप पेरणीपूर्व मशागतीचे कामे उरकली असून शेतकरी आता बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यानुषंगाने कृषी विभागानेही आवश्यक तयारी केली आहे. खत-बियाणे कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत विकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार कर्मचारीही नियुक्त करण्यात आले असून १९ पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. खरीप हंगामध्ये शेतकर्‍यांना रास्त दरामध्ये खत, बी-बियाणे उपलब्ध व्हावे, बोगस बियाणे त्यांच्या माथी मारले जावून नये यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये नऊ भरारी पथके, १० दक्षता पथके तर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकामध्ये जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, वजन-मापे निरीक्षक आणि मोहीम अधिकारी असणार आहेत. तसेच तालुकास्तरीय पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, वजन-मापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. भरारी पथकांसोबतच दहा दक्षता पथकेही गठित करण्यात आली आहेत. उपविभागीय स्तरावर दोन तर तालुकस्तरावर ही पथके कार्यरत असणार आहेत. उपविभागीय पथकात उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी अणि पंचायत समिती कृषी अधिकार्‍यांचा समावेश असेल. तालुकास्तरावरील पथकामध्ये तालुका व पंचायत समिती कृषी अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मोहीम अधिकारी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व पथके खत, बियाणे विक्रीवर नजर ठेवून असतील, असे कृषी विकास अधिकारी मिणीयार म्हणाले. कृषी केंद्रावर कर्मचारी खत, बी-बियाण्याची विक्री कर्मचार्‍यांसमक्ष करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उस्मानाबाद तालुक्यात ५२, तुळजापूर ४६, लोहारा ३०, उमरगा ७०, कळंब २३, वाशी ३६, भूम ३३ तर परंडा तालुक्यात ५३ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मोहीम अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.