शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मुंबई विद्यापीठाच्या १८ हजार उत्तरपत्रिका तपासल्या औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:30 IST

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्यासाठी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत विद्यापीठात वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आणि विधि विद्याशाखेच्या १८ हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासल्या आहेत

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्यासाठी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत विद्यापीठात वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आणि विधि विद्याशाखेच्या १८ हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासल्या आहेत. ३० पेक्षा अधिक प्राध्यापक प्रतिदिन १७०० ते १८०० उत्तरपत्रिका तपासत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला होता; मात्र हा निर्णय अंगलट आला आहे. चार महिने झाले तरी बहुतांश अभ्यासक्रमांचे निकाल रखडले आहेत. राज्यापालांनी निकाल जाहीर करण्याची दिलेली डेडलाइन पाळली नसल्यामुळे डॉ. देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्याचा प्रभारी पदभार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. शिंदे यांनी पदभार स्वीकारताच आपले होम पिच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाकडे उत्तरपत्रिका तपासून देण्याची विनंती केली. या विनंतीला औरंगाबादच्या विद्यापीठाने तात्काळ होकार दर्शवीत उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या; मात्र सर्व अडचणी दूर करीत विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली. मागील १५ दिवसांमध्ये १८ हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. यास व्यवस्थानशास्त्र विभागाचे संचालक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दुजोरा दिला. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आणि विधि विद्याशाखेचे ३० पेक्षा अधिक प्राध्यापक आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासत आहेत. प्रतिदिन सरासरी १७०० ते १८०० उत्तरपत्रिका तपासण्यात येत असून, काही वेळा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास मुंबई विद्यापीठाच्या अधिकाºयांची मदत घेण्यात येत आहे.