शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

१८ हजार लिटरने घटले दूध संकलन

By admin | Updated: May 7, 2015 00:58 IST

संजय तिपाले, बीड शेतीला पुरक व्यवसाय म्हणून एकेकाळी भरभराटीला पोहोचलेला दुग्धव्यवसाय आता तोट्यात आला आहे.

 

संजय तिपाले, बीडशेतीला पुरक व्यवसाय म्हणून एकेकाळी भरभराटीला पोहोचलेला दुग्धव्यवसाय आता तोट्यात आला आहे. सततचा दुष्काळ, चाराटंचाई व वाढलेल्या उत्पादनखर्चाने शेतकरी तिहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला असून मागील चार महिन्यात शासकीय व खासगी दूध संकलन केंद्रांत मिळून महिन्याकाठी १८ हजार लिटरची घट झाली आहे.जिल्हा एकेकाळी दूधउत्पादनात राज्यभर दबदबा ठेवून होता. धवलक्रांतीने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य तर दिलेच शिवाय आत्मविश्वासही जागविला होता. दुधापासून बनविल्या जाणाऱ्या तूप, दह्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसेही खेळू लागले होेते. मात्र, दूधउत्पादनाला समस्यांनी घेरल्याने अनेक शेतकऱ्यांनी दुधाचा धंदा अक्षरश: मोडीत काढला आहे. त्याचा थेट परिणाम दूधसंकलनावर झाला आहे. जानेवारी २०१५ मध्ये शासकीय दूध संकलन केंद्रात ७ हजार ९३६ लिटरने वाढ झाली होती. मात्र, मार्च महिन्याच्या अखेरीस दूध उत्पादनात १६ हजार लिटरपेक्षा अधिक घट झाली. एप्रिल महिन्यात टंचाईची तीव्रता वाढल्याने उत्पादनातील घट १८ हजार लिटरपर्यंत घसरली आहे. चारा, पाण्याची समस्या बिकट बनल्याने जनावरे पोसणे शेतकऱ्यांसाठी तापदायक ठरू लागले आहे. त्यामुळे दुभती जनावरे देखील बाजारात मांडली जात असून दावणी ओस पडू लागल्याचे निराशाजनक चित्र आहे.