शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

विष्णूपुरी जलाशयात १८ टक्के साठा

By admin | Updated: July 3, 2017 00:36 IST

नांदेड : विष्णूपुरी जलाशयात रविवारी सकाळी प्रकल्पात १८ टक्के पाणी उपलब्ध झाले असून जलाशयाची पाणीपातळी कासवगतीने वाढत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी जलाशयात रविवारी सकाळी प्रकल्पात १८ टक्के पाणी उपलब्ध झाले असून जलाशयाची पाणीपातळी कासवगतीने वाढत आहे़ गत दहा दिवसांपासून गोदावरी नदीक्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयात पाण्याचा येवा थांबला आहे़ नांदेडची तहान भागविणाऱ्या या प्रकल्पातील साठा समाधानकारक नसल्यामुळे पावसाळ्यातही शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यामुळे पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले होते़ मे अखेर प्रकल्पात केवळ २ टक्के साठा उपलब्ध होता़ पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेचा आधार होता़ मात्र विष्णूपुरी जलाशय कोरडा पडल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ यंदा पावसाने मृगात वेळेवर सुरूवात केल्यामुळे विष्णूपुरीतील पाणी झपाट्याने वाढू लागले़ पहिल्या दोन, तीन पावसाने जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाला होता़ परंतु मागील दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने जलाशयातील पाणीपातळी वाढ थांबली आहे़ २२ जून रोजी जलाशयात १४़४७ दलघमी म्हणजे १७ टक्के साठा होता़ त्यानंतर ३० जून रोजी १४़७९ दलघमी म्हणजे १८़ ३१ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे़ मागील दहा दिवसांत विष्णूपुरी जलाशयातील पाणी पातळीची वाढ पावसाअभावी थांबली आहे़ दरम्यान, समाधानकारक पावसामुळे जूनमध्ये विष्णूपुरी जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाल्याने महापालिकेने एक दिवसआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र अजुनही शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतातुर झाले आहेत़ जिल्ह्यात ६० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ मृगाच्या पावसावर काही ठिकाणी पेरण्या केल्या होत्या़ या पिकांना आता पाण्याची गरज आहे़ अनेक ठिकाणी पिके वाळत आहेत़ आषाढात दमदार पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते, अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे.