शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

विष्णूपुरी जलाशयात १८ टक्के साठा

By admin | Updated: July 3, 2017 00:36 IST

नांदेड : विष्णूपुरी जलाशयात रविवारी सकाळी प्रकल्पात १८ टक्के पाणी उपलब्ध झाले असून जलाशयाची पाणीपातळी कासवगतीने वाढत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी जलाशयात रविवारी सकाळी प्रकल्पात १८ टक्के पाणी उपलब्ध झाले असून जलाशयाची पाणीपातळी कासवगतीने वाढत आहे़ गत दहा दिवसांपासून गोदावरी नदीक्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयात पाण्याचा येवा थांबला आहे़ नांदेडची तहान भागविणाऱ्या या प्रकल्पातील साठा समाधानकारक नसल्यामुळे पावसाळ्यातही शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यामुळे पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले होते़ मे अखेर प्रकल्पात केवळ २ टक्के साठा उपलब्ध होता़ पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेचा आधार होता़ मात्र विष्णूपुरी जलाशय कोरडा पडल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ यंदा पावसाने मृगात वेळेवर सुरूवात केल्यामुळे विष्णूपुरीतील पाणी झपाट्याने वाढू लागले़ पहिल्या दोन, तीन पावसाने जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाला होता़ परंतु मागील दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने जलाशयातील पाणीपातळी वाढ थांबली आहे़ २२ जून रोजी जलाशयात १४़४७ दलघमी म्हणजे १७ टक्के साठा होता़ त्यानंतर ३० जून रोजी १४़७९ दलघमी म्हणजे १८़ ३१ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे़ मागील दहा दिवसांत विष्णूपुरी जलाशयातील पाणी पातळीची वाढ पावसाअभावी थांबली आहे़ दरम्यान, समाधानकारक पावसामुळे जूनमध्ये विष्णूपुरी जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाल्याने महापालिकेने एक दिवसआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र अजुनही शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतातुर झाले आहेत़ जिल्ह्यात ६० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ मृगाच्या पावसावर काही ठिकाणी पेरण्या केल्या होत्या़ या पिकांना आता पाण्याची गरज आहे़ अनेक ठिकाणी पिके वाळत आहेत़ आषाढात दमदार पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते, अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे.