शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांत १७ साखर कारखाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:04 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्यांत २६ साखर कारखान्यांपैकी १७ कारखान्यांत बॉयलर पेटले आहेत. ...

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्यांत २६ साखर कारखान्यांपैकी १७ कारखान्यांत बॉयलर पेटले आहेत. अन्य नऊ कारखाने बंदच आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ११ कारखाने आहेत. त्यापैकी सहा सहकारी व चार खासगी कारखान्यांचा समावेश आहे. यंदा त्यातील दोन सहकारी व चार खासगी कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. येथील दैनंदिन गाळप क्षमता १८,७०० मेट्रिक टन एवढी आहे.

जालना जिल्ह्यात पाच साखर कारखान्यांपैकी सर्व कारखान्यांत गाळप हंगाम सुरू आहे. यात तीन सहकारी व दोन खासगी कारखान्यांचा समावेश आहे. येथील दैनंदिन गाळप क्षमता १४ हजार मेट्रिक टन आहे.

बीड जिल्ह्यात ११ साखर कारखाने आहेत. फक्त सहा साखर कारखान्यांत साखर उत्पादन होत आहे. येथील गाळप क्षमता २८ हजार ४५० मेट्रिक टन आहे.

तीन जिल्हे मिळून २६ पैकी १७ कारखान्यांत गळीप हंगाम सुरू आहे; पण नऊ कारखाने बंद आहेत. कारण काही कारखान्यांत गैरव्यवहार झाला आहे, तर काही कारखाने तोट्यात आहेत. काही कारखाने जिथे उसाचे क्षेत्र नाही अशा भागात उघडण्यात आले आहेत. राज्य बँकेने कर्ज वसुलीसाठी अवसायनात काढले आहेत. यंदा उसाचे पीक भरघोस आले आहे. मात्र, परिस्थिती अशी आहे की, कारखाने कमी पडत आहेत. एकमेकांचा ऊस ओढण्यात कारखाने लागले आहेत. राजकीय अड्डा बनलेल्या या कारखाना बंदमुळे त्याचा परिणाम त्या भागातील शेतकऱ्यांवर झाला आहे. ऊस तोडणीसाठी शेतमजुरांना परजिल्ह्यात जावे लागत आहे. सर्व कारखाने सुरू असते तर या भागाचा विकास झाला असता. यंदा साखर उताराही सरासरी ८.०३ टक्के एवढा आहे.

चौकट

गैरव्यवहाराचे बळी

नऊ साखर कारखाने राजकारण व गैरव्यवहारचे बळी ठरले आहेत. शिवाय पक्षीय राजकारणाचा फटकाही कारखाना आणि ऊस उत्पादकांना बसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळी आणि शेतकरी ज्याप्रमाणे ऊस उत्पादन, दर आणि राज्य शासनाकडून मदत मिळवून घेण्याबाबत आग्रही आहेत, तसे चित्र मराठवाड्यात नसल्यानेही कारखाने आणि शेतकरी अडचणीत आहेत. शासनाचेही मराठवाड्यातील साखर कारखान्यांकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे.