शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

१६०० कोटीत २४ टीएमसी पाणी

By admin | Updated: April 16, 2016 23:43 IST

उदगीर : पुर्वीच्या सरकारने ७० हजार कोटी खर्चून प्रत्यक्षात एक टक्काही सिंचन काम केले नाही़ मी मंत्रालय सांभाळताना जलयुक्तच्या माध्यमातून

पालकमंत्र्यांचा दावा : ‘ग्रामोदय’ अभियानाचा शुभारंभउदगीर : पुर्वीच्या सरकारने ७० हजार कोटी खर्चून प्रत्यक्षात एक टक्काही सिंचन काम केले नाही़ मी मंत्रालय सांभाळताना जलयुक्तच्या माध्यमातून आतापर्यंत २४ टिएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करुन देण्याचे कार्य केले आहे़ यासाठी पुर्वीच्या सरकारने किमान ४२०० कोटी खर्च केले असत़े़ मात्र आपण हे काम केवळ १६०० कोटींमध्ये केल्याचा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी केला़उदगीर तालुक्यातील सताळा येथे झालेल्या जलयुक्त शिवार उपक्रम अंतर्गत कामांची पाहणी व ‘ग्रामोदयातून भारत उदय’ अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते शनिवारी झाला़ अध्यक्षस्थानी आ़ सुधाकर भालेराव होते़ तर व्यासपीठावर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जि़ प़ महिला बालकल्याण सभापती सुलोचना बिदादा, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ़ विकास खरात, तहसीलदार राहुल पाटील चेअरमन लक्ष्मण बिरगे, सरपंच सिंधुताई टंगेटोल आदींची प्रमुख उपस्थिती होती़जि़ प़ सदस्य रामचंद्र तिरुके यांनी सताळा परिसरात झालेल्या विकास कामांचा आढावा प्रास्ताविकात मांडला़ ग्रामोदय से भारत उदय, स्वच्छ भारत मिशन कक्ष जनजागृती व पंतप्रधान पीक विमा योजना घडीपुस्तिकांचे यावेळी विमोचन करण्यात आले़ तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले़ यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सताळा गावात झालेल्या जलयुक्त कामास पाहुन समाधानी असल्याचे सांगून १० लाख रुपयांचा निधी पुढील विकास कामासाठी देत असल्याची घोषणा केली़ महाराष्ट्रातील लातूर व बीड जिल्ह्यांनी दिग्गज नेते दिले़ हे जिल्हे पालकमंत्री म्हणून सांभाळणे अवघड आहेत़ स्त्रीचा काटकसर स्वभावगुण या मंत्रालयात काम करताना कामी येत आहे़ आ़ भालेराव यांनी हे गाव दत्तक घ्यावे मी लागेल ती मदत करेल असेही यावेळी मुंडे म्हणाल्या़यावेळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दुर्मिळ छायाचित्र संग्रहाचे उद्घाटन झाले़ सूत्रसंचालन धनंजय गुडसूरकर यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी मानले़ यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)जलयुक्तशी नाळ पुर्वीपासूनच़़़सत्तेत नसताना वैद्यनाथ पॅटर्न नावाखाली मी जलयुक्त शिवार कार्यक्रम सुरु केला़ जात, पात आणि वय या भिंती तोडून गावाच्या एकतेतून विकास करण्यासाठी जलयुक्त आहे़ ज्या माता भगिनींनी माझ्या डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवला त्या माता भगिनींच्या डोक्यांवरील हंडा उतरविण्याचे कार्य मी करणार आहे असा उल्लेख मंत्री मुंडे यांनी यावेळी केला़ सताळा येथील जलयुक्त विकास कामांना पाहुन भारावून गेलेल्या मंत्री महोदया मुंडे यांनी माझ्यापेक्षा विकास कामाचे फोटो काढा ते महत्वाचे आहे असे म्हणत आपल्या मोबाईल मधुन विकास कामासोबत सेल्फी काढला़