शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

गटाचे १६, गणांचे ३० अर्ज ‘आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 00:51 IST

उस्मानाबाद : वाशी आणि परंडा तालुक्यात सर्वच अर्ज वैध ठरले. उस्मानाबादेत गटातून एक तर गणातून पाच अर्ज अवैध ठरले.

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १६५ जागांसाठी तब्बल १ हजार ८०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी या सर्व अर्जांची त्या-त्या तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली. यावेळी वाशी आणि परंडा तालुक्यात सर्वच अर्ज वैध ठरले. उस्मानाबादेत गटातून एक तर गणातून पाच अर्ज अवैध ठरले. लोहाऱ्यात गणासाठीचा एक तर गटाचे पाच, तुळजापुरात गणाचे चार, कळंबमध्ये गणो चार आणि गटाचे तीन, उमरगयात गणाचे सात आणि गटाचे पाच तर भूम येथे गणाचे नऊ आणि गटांचे दोन उमेदवारी अर्ज विविध कारणांवरून अवैध ठरविण्यात आले. उस्मानाबाद येथे यात कुणाचे अर्ज सही नसल्याने तर कुणी अर्जासोबत सत्यप्रत जोडली नसल्याने अर्ज बाद ठरविण्यात आले. दरम्यान, अर्ज बाद ठरविलेल्या उमेदवारांना न्यायाधिशांकडे अपील करण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत असून, ८ फेब्रुवारीपर्यंत यावर सुनावणी होवून निकाल दिला जाणार आहे. परंडा : तालुक्यात ५ गटासाठी ५९ तर १० गणासाठी एकूण ११९ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठरल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांनी सांगितले. शिवसेनेकडून जवळा (नि) गटातून दत्ता साळुंके, राष्ट्रवादीचे हणुमंत कातुरे, संजय पवार, भाजपाचे राहुल कारकर, काँगेसचे शिवाजी नाईकनवरे, रासपचे बप्पाजी काळे, लोणी गटात शिवसेनेकडून अर्चना जाधव, पार्वती जाधव, काशीबाई इतापे, भाजपच्या ज्योती टोंपे, संगीता चौधरी, शैला वेताळ, राष्ट्रवादीच्या सुनिता जाधव, काँगेसच्या अनिता काकडे, रासपच्या प्रज्ञा काळे,अनाळा गटात शिवसेनकडून गौतम लटके, पोपट गोडगे, भाजपकडून गिरीधर कोलते, राष्ट्रवादीचे दतात्रय पाटील, काँगेसचे नवनाथ तिंबोळे, मनसेचे नानासाहेब पडघन, कमलाकर खैरे, डोंजा गटात शिवसेनेकडून अंजली संदीप खरसडे, भाजपाकडून अर्चना गणेश खरसडे, राष्ट्रवादीकडून अविदाबाई जगताप, काँगेसकडून शशीकला गाढवे, शेळगाव गटात शिवसेनेकडून अंजली पाटील, भाजपाकडून सखूबाई पवार तर राष्ट्रवादीकडून अश्विनी भांडवलकर, काँगेसच्या शारदा भोसले आदींनी उमेदवारी दाखल केली. लोणी गणात शिवसेनेचे रणजित पाटील, शंकर इतापे, भाजपाकडून सुखदेव टोंपे, सोनारी गणात राष्ट्रवादीकडून सुधाकर कोकाटे, समाधान पाडूळे, शिवसेनेकडून डॉ. शहाजी मिस्कीन, बालाजी मिस्कीन, अंगद फरतडे, भाजपाकडून विलास खोसरे, मनोहर मिस्कीन, शिवानंद तळेकर, काँग्रेस बालाजी नेटके, आनाळा गणात राहूल डोके, भाजपा निशिकांत क्षीरसागर, राष्ट्रवादीकडून प्रणिता मोरे आदींनी अर्ज दाखल केले होते.