शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

१६ हजार शेतकºयांचाच पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:07 IST

परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २० जून ते २५ जुलै या ३५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार शेतकºयांपैकी फक्त १५ हजार ८९६ शेतकºयांचाच बँकांनी पीक विमा काढला

ठळक मुद्देजिल्ह्यात ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. तीन लाख २० हजार शेतकरी अजूनही विमा काढण्याच्या प्रतीक्षेत

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २० जून ते २५ जुलै या ३५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार शेतकºयांपैकी फक्त १५ हजार ८९६ शेतकºयांचाच बँकांनी पीक विमा काढला असून आता फक्त पाच दिवसांमध्ये उर्वरित तीन लाख २० हजार शेतकºयांचा पीक विमा काढण्याचे डोंगरा एवढे उद्दिष्ट बँकांसमोर आहे. सद्यस्थितीत बँकांमधून होत असलेल्या कामानुसार हे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य असल्याने पीक विमा भरण्यास मुदतवाढ देणे क्रमप्राप्त होणार असल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.यावर्षी जिल्हा कृषी कार्यालयाने खरीप २०१७ या हंगामात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यापैकी २४ जुलैपर्यंत ४ लाख ५२ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. या शेतकºयांना २० जून ते ३१ जुलै या दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, बाजरी, भात आदी पिकांचा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आॅनलाईन पद्धतीने आपल्या पिकांचा पीक विमा उतरविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकºयांचा पीक विमा भरण्यासाठी वाढता कल पाहता काही दिवसांपूर्वी शेतकºयांची बॅकेत एकच गर्दी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३७४ महा ई-सेवा केंद्रावर पीक विमा भरण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली.दिलेल्या मुदतीत शेतकºयांना आपल्या पिकांचा विमा उतरविता यावा, हा उद्देश होता. पीक विम्याचा आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी लागणारा २४ रुपयांचा खर्चही शासन महा ई-सेवा केंद्रांना देणार आहे. परंतु, जिल्ह्यातील बँकां शेतकºयांचा पीक विमा स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहेत.बँकेत आलेल्या शेतकºयांना महा ई-सेवा केंद्रांचा रस्ता दाखवला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. महा ई-सेवा केंद्रावर गेल्यानंतर सर्व्हर डाऊनची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकºयांना महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून पीक विमा भरण्यासाठी एक-एक दिवस वाट पहावी लागत आहे. २० जून ते २४ जुलै या कालावधीत केवळ १५ हजार ८९६ शेतकºयांनीच पीक विमा उतरविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास तीन लाख २० हजार शेतकरी अजूनही विमा काढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे उर्वरित पाच दिवसांत आपल्या पिकांचा विमा उतरविणे होईल का? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून प्रत्येक बँकांना पीक विमा भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.