शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार शेतकºयांचाच पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:07 IST

परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २० जून ते २५ जुलै या ३५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार शेतकºयांपैकी फक्त १५ हजार ८९६ शेतकºयांचाच बँकांनी पीक विमा काढला

ठळक मुद्देजिल्ह्यात ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. तीन लाख २० हजार शेतकरी अजूनही विमा काढण्याच्या प्रतीक्षेत

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २० जून ते २५ जुलै या ३५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार शेतकºयांपैकी फक्त १५ हजार ८९६ शेतकºयांचाच बँकांनी पीक विमा काढला असून आता फक्त पाच दिवसांमध्ये उर्वरित तीन लाख २० हजार शेतकºयांचा पीक विमा काढण्याचे डोंगरा एवढे उद्दिष्ट बँकांसमोर आहे. सद्यस्थितीत बँकांमधून होत असलेल्या कामानुसार हे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य असल्याने पीक विमा भरण्यास मुदतवाढ देणे क्रमप्राप्त होणार असल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.यावर्षी जिल्हा कृषी कार्यालयाने खरीप २०१७ या हंगामात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यापैकी २४ जुलैपर्यंत ४ लाख ५२ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. या शेतकºयांना २० जून ते ३१ जुलै या दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, बाजरी, भात आदी पिकांचा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आॅनलाईन पद्धतीने आपल्या पिकांचा पीक विमा उतरविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकºयांचा पीक विमा भरण्यासाठी वाढता कल पाहता काही दिवसांपूर्वी शेतकºयांची बॅकेत एकच गर्दी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३७४ महा ई-सेवा केंद्रावर पीक विमा भरण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली.दिलेल्या मुदतीत शेतकºयांना आपल्या पिकांचा विमा उतरविता यावा, हा उद्देश होता. पीक विम्याचा आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी लागणारा २४ रुपयांचा खर्चही शासन महा ई-सेवा केंद्रांना देणार आहे. परंतु, जिल्ह्यातील बँकां शेतकºयांचा पीक विमा स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहेत.बँकेत आलेल्या शेतकºयांना महा ई-सेवा केंद्रांचा रस्ता दाखवला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. महा ई-सेवा केंद्रावर गेल्यानंतर सर्व्हर डाऊनची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकºयांना महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून पीक विमा भरण्यासाठी एक-एक दिवस वाट पहावी लागत आहे. २० जून ते २४ जुलै या कालावधीत केवळ १५ हजार ८९६ शेतकºयांनीच पीक विमा उतरविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास तीन लाख २० हजार शेतकरी अजूनही विमा काढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे उर्वरित पाच दिवसांत आपल्या पिकांचा विमा उतरविणे होईल का? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून प्रत्येक बँकांना पीक विमा भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.