शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

१६ हजार शेतकºयांचाच पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:07 IST

परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २० जून ते २५ जुलै या ३५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार शेतकºयांपैकी फक्त १५ हजार ८९६ शेतकºयांचाच बँकांनी पीक विमा काढला

ठळक मुद्देजिल्ह्यात ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. तीन लाख २० हजार शेतकरी अजूनही विमा काढण्याच्या प्रतीक्षेत

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २० जून ते २५ जुलै या ३५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार शेतकºयांपैकी फक्त १५ हजार ८९६ शेतकºयांचाच बँकांनी पीक विमा काढला असून आता फक्त पाच दिवसांमध्ये उर्वरित तीन लाख २० हजार शेतकºयांचा पीक विमा काढण्याचे डोंगरा एवढे उद्दिष्ट बँकांसमोर आहे. सद्यस्थितीत बँकांमधून होत असलेल्या कामानुसार हे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य असल्याने पीक विमा भरण्यास मुदतवाढ देणे क्रमप्राप्त होणार असल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.यावर्षी जिल्हा कृषी कार्यालयाने खरीप २०१७ या हंगामात ५ लाख २१ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यापैकी २४ जुलैपर्यंत ४ लाख ५२ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. या शेतकºयांना २० जून ते ३१ जुलै या दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, बाजरी, भात आदी पिकांचा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आॅनलाईन पद्धतीने आपल्या पिकांचा पीक विमा उतरविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकºयांचा पीक विमा भरण्यासाठी वाढता कल पाहता काही दिवसांपूर्वी शेतकºयांची बॅकेत एकच गर्दी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३७४ महा ई-सेवा केंद्रावर पीक विमा भरण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली.दिलेल्या मुदतीत शेतकºयांना आपल्या पिकांचा विमा उतरविता यावा, हा उद्देश होता. पीक विम्याचा आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी लागणारा २४ रुपयांचा खर्चही शासन महा ई-सेवा केंद्रांना देणार आहे. परंतु, जिल्ह्यातील बँकां शेतकºयांचा पीक विमा स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहेत.बँकेत आलेल्या शेतकºयांना महा ई-सेवा केंद्रांचा रस्ता दाखवला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. महा ई-सेवा केंद्रावर गेल्यानंतर सर्व्हर डाऊनची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकºयांना महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून पीक विमा भरण्यासाठी एक-एक दिवस वाट पहावी लागत आहे. २० जून ते २४ जुलै या कालावधीत केवळ १५ हजार ८९६ शेतकºयांनीच पीक विमा उतरविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास तीन लाख २० हजार शेतकरी अजूनही विमा काढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे उर्वरित पाच दिवसांत आपल्या पिकांचा विमा उतरविणे होईल का? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून प्रत्येक बँकांना पीक विमा भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.