शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

१५७ ठिकाणचे पाणी दूषित

By admin | Updated: March 20, 2016 23:47 IST

किशोरसिंह चौहाण, मुखेड पाणीटंचाईने ग्रासलेल्या मुखेड तालुक्यातील ४६ गावांतील पिण्याचे पाणी अनुजैविक रासायनिक तपासणीत दूषित आढळून आले असून १५७ ठिकाणचे पिण्याअयोग्य असल्याचे पुढे आले आहे़

किशोरसिंह चौहाण, मुखेड पाणीटंचाईने ग्रासलेल्या मुखेड तालुक्यातील ४६ गावांतील पिण्याचे पाणी अनुजैविक रासायनिक तपासणीत दूषित आढळून आले असून १५७ ठिकाणचे पिण्याअयोग्य असल्याचे पुढे आले आहे़मुखेड तालुक्यात मागील दोन वर्षांपासून भीषण पाणीटंचाईला पुढे जावे लागत असून जमिनीची पातळी खालावली आहे़ ग्रामीण भागात पुरवठा केले जाणारे अशुद्ध असल्याचे अनेकवेळा पुढे आले असतानाही ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी पाजवण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे दिसून येत आहे़ ग्रामीण भागात शौचालय व सार्वजनिक नाल्याची व्यवस्था नसल्याने घाण पाणी जमिनीत मुरते़ ग्रामीण भागातील नागरिक सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास बसतात़ ती घाण पावसाळ्यात वाहून विहीर, तलाव, नदीत जाते आणि तोच पाणी शुद्ध न करता पुरवठा केला जातो़ गावातील सार्वजनिक विंधन विहीर, हातपंप व बोअरजवळच ग्रामस्थ धुणे धुतात़ जनावरांना पाणी पाजवून त्याच ठिकाणी पशूधन धुतले जाते़ तेच घाण पाणी जमिनीतून मुरून पुन्हा हातपंपाच्या द्वारे पिण्यास वापरण्यास घेतला जातो़ अशा पाण्याची अनुजैविक व रासायनिक तपासणी केली असता सदर पाणी दूषित असल्याचे सांगितले जाते; पण ग्रामस्थांना दुसरे शुद्ध पाणी मिळत नसल्याने मजबुरीने पाणी प्यावे लागते़ अशुद्ध पाणी सेवनाने अनेक रोग पछाडतात़केंद्र शासनाने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी मागासक्षेत्र अनुदान योजनेत नांदेड जिल्ह्याची निवड केली होती़ या योजनेअंतर्गत मुखेड तालुक्यातील ५८ गावांत जलशुद्धीकरण उपकरणे बसवण्यासाठी ८ जानेवारी १५ रोजी पंचायत समितीने परवानगी मागितली होती़ यापैकी ३३ गावांसाठी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी देत यासाठी लागणारा १ कोटी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता़ पण संबंधित ग्रामसेवकाने जलशुद्धीकरण सयंत्र बसवण्याच्या कामात हाती घेतली नाही़ यामुळे या योजनेचा निधी परत गेला़ ग्रामसेवक संबंधित अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ३३ गावांतील ग्रामस्थांना आजही अशुद्ध पाणी सेवन करावे लागत आहे़ यापूर्वी ८० गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित आढळून आले होते़ तीन महिन्यात आणखी ४६ गावांतील पाणी स्त्रोत आले आहे़स्थानिक प्रशासन व ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभारामुळे बंद पडलेली शुद्ध पेयजल योजना पुन्हा कार्यान्वित करून तालुक्यातील प्रत्येक गावात ही योजना राबवण्यणाची सुरुवात करावी यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जांबचे सरपंच बाळासाहेब पुंडे, तारदडवाडीचे सरपंच हणमंत नरोटे, सावरगाव वाडीचे सरपंच नारायण चमकुरे, खैरक्याचे सरपंच लक्ष्मण पाटील खैरकेकर, जुन्याचे सरपंच मारोती पाटील अमनर यांनी केले आहे़