शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
4
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
5
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
6
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
7
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
8
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
9
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
10
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
12
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
13
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
14
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
15
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
16
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
17
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
18
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
19
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
20
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक

१५७ कोटींचा पीक विमा मंजूर

By admin | Updated: May 20, 2015 00:18 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी मागील चार ते वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी मागील चार ते वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत नैसर्गित आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी, यासाठी गत वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी १५ कोटी ९७ लाख रुपयांचा विमा हप्ता भरून ३ लाख २२ हेक्टरवरील पिके संरक्षित केली होती. यापैकी ६ लाख २५ हजार शेतकऱ्यांना १५७ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.गतवर्षी उस्मानाबाद, लोहारा, वाशी, भूम, परंडा व उमरगा या तालुक्यात अल्प पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पुढील काळात पाऊस पडेल, या आशेवर अत्यल्प पावसावरच खरिपाची पेरणी केली होती. परंतु, पेरणीनंतरही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ या संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हातून हा हंगाम गेला. या हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख २२ हेक्टरसाठी १५ कोटी ९७ लाख रुपयांचा विमा भरला होता. त्याची विमा संरक्षीत ५०१ कोटी ८१ लाख ऐवढी होती. मात्र, विमा कंपनीने ६ लाख २५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १५७ कोटी १३ लाख रुपयांचा विमा मंजूर केला आहे. त्यामुळे सव्वालाखावर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यत कोणत्या तालुक्याला किती पीक विमा मंजूर झाला, याची माहिती अद्याप कृषी विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)