शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

१५७ कोटींचा पीक विमा मंजूर

By admin | Updated: May 20, 2015 00:18 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी मागील चार ते वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकरी मागील चार ते वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत नैसर्गित आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी, यासाठी गत वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी १५ कोटी ९७ लाख रुपयांचा विमा हप्ता भरून ३ लाख २२ हेक्टरवरील पिके संरक्षित केली होती. यापैकी ६ लाख २५ हजार शेतकऱ्यांना १५७ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे.गतवर्षी उस्मानाबाद, लोहारा, वाशी, भूम, परंडा व उमरगा या तालुक्यात अल्प पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पुढील काळात पाऊस पडेल, या आशेवर अत्यल्प पावसावरच खरिपाची पेरणी केली होती. परंतु, पेरणीनंतरही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ या संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हातून हा हंगाम गेला. या हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी ३ लाख २२ हेक्टरसाठी १५ कोटी ९७ लाख रुपयांचा विमा भरला होता. त्याची विमा संरक्षीत ५०१ कोटी ८१ लाख ऐवढी होती. मात्र, विमा कंपनीने ६ लाख २५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १५७ कोटी १३ लाख रुपयांचा विमा मंजूर केला आहे. त्यामुळे सव्वालाखावर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यत कोणत्या तालुक्याला किती पीक विमा मंजूर झाला, याची माहिती अद्याप कृषी विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)