शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

बदलीवर आलेले १५ शिक्षक गायब

By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST

हिंगोली : सेनगाव तालुक्यात परजिल्ह्यातून बदलीवर आलेले १५ शिक्षक गायब झाले

हिंगोली : सेनगाव तालुक्यात परजिल्ह्यातून बदलीवर आलेले १५ शिक्षक गायब झाले असून त्यांनी जिल्हा परिषदेत वजन वापरून सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात खुद्द सेनगाव पं.स.च्या सभापती शेषीकलाबाई पाटील, उपसभापती लक्ष्मीबाई गडदे यांनी तक्रार केली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या दोन वर्षापासून परजिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी तर जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक असल्याचा प्रकार घडत आहे. यामध्ये मोठे अर्थकारण होत असून या बाबीकडे जिल्हा परिषदेतील अधिकारी कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेले शिक्षक ज्या गावाच्या नावाने पदस्थापना मिळवितात, त्या गावी रुजू न होता, जिल्हा परिषदेत आर्थिक वजन दाखवून सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवितात, अशी आतापर्यंत चर्चा होती. आता या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. सेनगाव तालुक्यात पर जिल्ह्यातून १५ शिक्षक जून २०१३ ते जून २०१४ या कालावधीत बदलीवर आले. त्यामध्ये चांदू गणपती लोंढे (नियुक्ती जि.प.शाळा कापडसिंगी), दीपक कदम (ब्रम्हवाडी), संतोष अंभोरे (उटी), गजानन भिसे (बन), कृष्णा गाढवे (बन), नागनाथराव काळे (डोंगरगाव), सतीश पुरी (धोत्रा), जाधव (खैरी), सुरेश बेंडे (जामदया), महेश वाघमारे (बरडा), शंकर शिंदे (बोडखा), राजेश काळबांडे (तांदुळवाडी), दशरथ कदम (मकोडी), अनिता जाधव (कडोळी), साहेबराव खोडक (गणेशपूर) या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या; परंतु हे सर्व शिक्षक नियुक्त करण्यात आलेल्या शाळेवर रुजू न होता, त्यांनी एकवेळा सेनगाव येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर जिल्हा परिषदेतून सेनगाव तालुक्याऐवजी अन्य सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळविली. परिणामी या शिक्षकांच्या जागा तशाच रिक्त आहेत. परिणामी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सभापती, उपसभापतींची तक्रारया संदर्भात सेनगाव पं.स.च्या सभापती शेषीकलाबाई गोपाळराव पाटील, उपसभापती लक्ष्मीबाई गडदे, पं.स. सदस्या पुनम नागेश कोटकर यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गुरूवारी तक्रार केली. त्यामध्ये तालुक्यात नियुक्त करण्यात आलेले १५ शिक्षक मुळ गावी रुजू झाले नसून अन्य ठिकाणी रुजू झाले आहेत. त्यामुळे या भागातील शाळांना शिक्षकांअभावी कुलूप लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांची तात्काळ त्यांच्या मुळ पदस्थापनेवर नियुक्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.