शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

१५ थकबाकीदारांची मालमत्ता होणार जप्त

By admin | Updated: November 12, 2014 00:26 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकार न्यायालयात जिल्ह्यातील १५ थकबाकीदार संस्थेच्या संचालक व सभासंदाविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते.

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकार न्यायालयात जिल्ह्यातील १५ थकबाकीदार संस्थेच्या संचालक व सभासंदाविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते. सहकार न्यायालयाने त्यांच्या विरुद्धचे डिक्री सर्टिफिकेट दिले असल्याने आता सदरील १५ थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीचे अधिकार प्राप्त झाले आहेत. कर्ज भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. कर्ज न भरल्यास आता थेट जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीस मंडळाचे अध्यक्ष डी.बी. मुकणे यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विविध संस्थांनी कोट्यावधीचे कर्ज घेतले होते. एकूण ४४५ संस्थांनी १७८ कोटी ५९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ३५४ संस्थांकडे १२३ कोटी ५९ लाख रूपये कर्ज आहे. यातील ४० संस्थांना बँकेच्या वतीने वारंवार नोटीसा पाठविण्यात आल्या मात्र त्यांनी कर्ज न भरल्याने औरंगाबादच्या सहकार न्यायालयात दावे दाखल केले होते. या ४० संस्थांकडे ७६ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे़ थकीत बाकी तात्काळ भरावी या आशाच्या या नोटिसा होत्या मात्र त्यांनी कर्जाचा भरणा केला नसल्याने त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मयत कर्जदारांच्या कुटुंबीय, वारसदाराकडून वसूलीडीसीसी बँकेमार्फत ज्यांनी-ज्यांनी कर्ज घेतले आहेत त्यांना नोटीसा देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जवळपास सर्वांना नोटिसा मिळाल्या आहेत. संस्थेचे संचालक मयत झाले असतील तर त्यांचे वारसदार,कुटुंबियाकडून कर्जाची वसूली होणार आहे. डीसीसीमार्फत अनेक संस्थांनी कर्ज घेतले आहे. जुन्या सर्व थकबाकीदारांची माहिती काढली जात आहे व नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने थकबाकीदारांना नियम १०७ अंतर्गत डिमांड नोटीस पाठविण्यात आली आहे़ सर्व थकबाकीदारांनी कर्ज भरावे, असे आवाहन प्रशासक मुकणे यांनी केले आहे़सहकार न्यायालयात खटले दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षाच्या वतीने चार्टड अकाँऊटंट मार्फत खाते उताऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेशित केले जाते. ही पध्दत वेळखाऊ आहे़ दावे लवकरात लवकर निकाली काढले जावेत यासाठी दावा न्यायालयात दाखल होण्यापूर्वी बीड येथूनच चार्टर्ड अकाँऊटंट मार्फत खाते उताऱ्यांची पडताळणी करण्यात आली असल्याचे प्रशासक डी.बी. मुकणे यांनी सांगितले. त्यामुळे खटला दाखल झाल्यानंतर फारशा अडचणी भासणार नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.