शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

समाजकल्याणच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या १४७ जागा रिक्त

By admin | Updated: July 30, 2014 01:02 IST

नांदेड : जिल्ह्यात विशेष समाजकल्याण कार्यालयामार्फत एकूण १५ वसतिगृह सुरु असून यापैकी ७ भाड्याच्या इमारतीत चालतात. विद्यार्थी मान्य संख्या असतांना १४७ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

नांदेड : जिल्ह्यात विशेष समाजकल्याण कार्यालयामार्फत एकूण १५ वसतिगृह सुरु असून यापैकी ७ भाड्याच्या इमारतीत चालतात. विद्यार्थी मान्य संख्या असतांना जागेअभावी १४७ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.जिल्ह्यात नांदेड-२, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर, उमरी, अर्धापूर व हदगाव आदी ठिकाणी ९ वसतिगृह चालतात. तर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोयीचे व्हावे, यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, देगलूर, भोकर, हदगांव व उमरी या तालुक्याच्या ठिकाणी ६ नवीन वसतिगृह सुरु करण्यात आली आहेत. यापैकी बऱ्याच वसतिगृहात प्रवेशक्षमतेपेक्षा कमी खोल्या असल्याने प्रशासकीय कारण दाखवित विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.शासनाने वसितगृहास विद्यार्थी प्रवेश क्षमता ठरवून दिली असून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची तरतुद केलेली आहे. मात्र काही वसतिगृहात इमारतक्षमतेचा विचार करुन प्रवेशच दिला नसल्याने गरीब विद्यार्थ्यांना खोली भाड्याने घ्यावी लागल्याने आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. विशेष समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती जमातीच्या मागास विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देता यावे, यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. मात्र जिल्ह्यातील बहुतांस वसतिगृहांना स्वत:ची इमारत नसल्याने तसेच उपलब्ध जागा अपुरी असल्याने गरजूवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची भाड्याची इमारत बऱ्यापैकी असली तरी शहरातीलच गुणवंत मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. या वसतिगृहाला कायमस्वरुपी गृहपाल नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय बिलोली, धर्माबाद, अर्धापूर येथील मुलांच्या तर मुखेड, देगलूर, भोकर, हदगांव व उमरी येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मुलींच्या वसतिगृहानांही कायमस्वरुपी गृहपाल नाही. (प्रतिनिधी)एकूण १५ वसतिगृहात १४८५ विद्यार्थी मान्यसंख्या आहे. इमारत क्षमता १४७७ असल्याची समाजकल्याण कार्यालयाकडे नोंद आहे. परंतु १३३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून १४७ विद्यार्थ्यांच्या जागा अद्यापही रिक्त आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांत शालेय विद्यार्थी ५००, महाविद्यालयीन ७८८, दारिद्र्य रेषेखालील ४२ विद्यार्थ्यांचे खास बाब प्रवेश आहेत.