शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या १४७ जागा रिक्त

By admin | Updated: July 30, 2014 01:02 IST

नांदेड : जिल्ह्यात विशेष समाजकल्याण कार्यालयामार्फत एकूण १५ वसतिगृह सुरु असून यापैकी ७ भाड्याच्या इमारतीत चालतात. विद्यार्थी मान्य संख्या असतांना १४७ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

नांदेड : जिल्ह्यात विशेष समाजकल्याण कार्यालयामार्फत एकूण १५ वसतिगृह सुरु असून यापैकी ७ भाड्याच्या इमारतीत चालतात. विद्यार्थी मान्य संख्या असतांना जागेअभावी १४७ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.जिल्ह्यात नांदेड-२, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर, उमरी, अर्धापूर व हदगाव आदी ठिकाणी ९ वसतिगृह चालतात. तर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोयीचे व्हावे, यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, देगलूर, भोकर, हदगांव व उमरी या तालुक्याच्या ठिकाणी ६ नवीन वसतिगृह सुरु करण्यात आली आहेत. यापैकी बऱ्याच वसतिगृहात प्रवेशक्षमतेपेक्षा कमी खोल्या असल्याने प्रशासकीय कारण दाखवित विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.शासनाने वसितगृहास विद्यार्थी प्रवेश क्षमता ठरवून दिली असून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची तरतुद केलेली आहे. मात्र काही वसतिगृहात इमारतक्षमतेचा विचार करुन प्रवेशच दिला नसल्याने गरीब विद्यार्थ्यांना खोली भाड्याने घ्यावी लागल्याने आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. विशेष समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती जमातीच्या मागास विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देता यावे, यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. मात्र जिल्ह्यातील बहुतांस वसतिगृहांना स्वत:ची इमारत नसल्याने तसेच उपलब्ध जागा अपुरी असल्याने गरजूवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची भाड्याची इमारत बऱ्यापैकी असली तरी शहरातीलच गुणवंत मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. या वसतिगृहाला कायमस्वरुपी गृहपाल नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय बिलोली, धर्माबाद, अर्धापूर येथील मुलांच्या तर मुखेड, देगलूर, भोकर, हदगांव व उमरी येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मुलींच्या वसतिगृहानांही कायमस्वरुपी गृहपाल नाही. (प्रतिनिधी)एकूण १५ वसतिगृहात १४८५ विद्यार्थी मान्यसंख्या आहे. इमारत क्षमता १४७७ असल्याची समाजकल्याण कार्यालयाकडे नोंद आहे. परंतु १३३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून १४७ विद्यार्थ्यांच्या जागा अद्यापही रिक्त आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांत शालेय विद्यार्थी ५००, महाविद्यालयीन ७८८, दारिद्र्य रेषेखालील ४२ विद्यार्थ्यांचे खास बाब प्रवेश आहेत.