शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

समाजकल्याणच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या १४७ जागा रिक्त

By admin | Updated: July 30, 2014 01:02 IST

नांदेड : जिल्ह्यात विशेष समाजकल्याण कार्यालयामार्फत एकूण १५ वसतिगृह सुरु असून यापैकी ७ भाड्याच्या इमारतीत चालतात. विद्यार्थी मान्य संख्या असतांना १४७ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

नांदेड : जिल्ह्यात विशेष समाजकल्याण कार्यालयामार्फत एकूण १५ वसतिगृह सुरु असून यापैकी ७ भाड्याच्या इमारतीत चालतात. विद्यार्थी मान्य संख्या असतांना जागेअभावी १४७ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत.जिल्ह्यात नांदेड-२, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर, उमरी, अर्धापूर व हदगाव आदी ठिकाणी ९ वसतिगृह चालतात. तर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सोयीचे व्हावे, यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, देगलूर, भोकर, हदगांव व उमरी या तालुक्याच्या ठिकाणी ६ नवीन वसतिगृह सुरु करण्यात आली आहेत. यापैकी बऱ्याच वसतिगृहात प्रवेशक्षमतेपेक्षा कमी खोल्या असल्याने प्रशासकीय कारण दाखवित विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.शासनाने वसितगृहास विद्यार्थी प्रवेश क्षमता ठरवून दिली असून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अनुदानाची तरतुद केलेली आहे. मात्र काही वसतिगृहात इमारतक्षमतेचा विचार करुन प्रवेशच दिला नसल्याने गरीब विद्यार्थ्यांना खोली भाड्याने घ्यावी लागल्याने आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. विशेष समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती जमातीच्या मागास विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देता यावे, यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. मात्र जिल्ह्यातील बहुतांस वसतिगृहांना स्वत:ची इमारत नसल्याने तसेच उपलब्ध जागा अपुरी असल्याने गरजूवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची भाड्याची इमारत बऱ्यापैकी असली तरी शहरातीलच गुणवंत मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. या वसतिगृहाला कायमस्वरुपी गृहपाल नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय बिलोली, धर्माबाद, अर्धापूर येथील मुलांच्या तर मुखेड, देगलूर, भोकर, हदगांव व उमरी येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मुलींच्या वसतिगृहानांही कायमस्वरुपी गृहपाल नाही. (प्रतिनिधी)एकूण १५ वसतिगृहात १४८५ विद्यार्थी मान्यसंख्या आहे. इमारत क्षमता १४७७ असल्याची समाजकल्याण कार्यालयाकडे नोंद आहे. परंतु १३३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून १४७ विद्यार्थ्यांच्या जागा अद्यापही रिक्त आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांत शालेय विद्यार्थी ५००, महाविद्यालयीन ७८८, दारिद्र्य रेषेखालील ४२ विद्यार्थ्यांचे खास बाब प्रवेश आहेत.