शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

जिल्ह्यातील १४४५ अंगणवाड्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:19 IST

मानधनवाढीच्या मागणीसाठी ११ सप्टेंबरपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्याने जिल्ह्यातील १६६३ पैकी १४४५ अंगणवाड्या गेल्या १५ दिवसांपासून बंद आहेत.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मानधनवाढीच्या मागणीसाठी ११ सप्टेंबरपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्याने जिल्ह्यातील १६६३ पैकी १४४५ अंगणवाड्या गेल्या १५ दिवसांपासून बंद आहेत. परिणामी या अंगणवाड्यांमध्ये शिक्षणासाठी येणाºया चिमुकल्यांची गैरसोय होत असल्याचा प्रकार जिल्हाभरात पहावयास मिळत आहे.जिल्ह्यातील ६ वर्षापर्यंतची बालके, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आहार, पोषण व आरोग्य सेवा विषयीच्या विविध सेवांची अंमलबजावणी एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाच्या वतीने अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. अंगणवाडी केंद्राच्या सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्यावर या सेवांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ जिल्ह्यामध्ये १ हजार ६६३ अंगणवाडी केंद्र आहेत़ या केंद्रामध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख २८ हजार १४५ बालके शिक्षण घेतात़या बालकांसाठी या अंगणवाड्यांमध्ये १ हजार ६४४ अंगणवाडी सेविका व १ हजार ४८८ मदतनीस कार्यरत आहेत़ ११ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या मानधनात शासनाने वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी संपावर गेल्या आहेत़अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने ५ हजार रुपये, मदतनिस यांना २ हजार ५०० रुपये मानधन दिले जाते़ तर मिनी अंगणवाडी सेविकांना ३ हजार २५० रुपये मानधन दिले जाते़ अंगणवाडी सेविकांच्या या संपामुळे शासनाने अंगणवाडी सेविकेला १ हजार ५०० रुपये, मदतनीस यांना १ हजार रुपये व मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनात १२५० रुपयांची वाढ केली़ परंतु, जोपर्यंत शासनाकडे समितीने केलेल्या शिफारशीनुसार मानधनात वाढ होत नाही़ तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका अंगणवाडी सेविकांच्या वतीने घेण्यात आली आहे़ त्यामुळे शासनाच्या महिला व बालविकास विभागाने २० सप्टेंबर रोजी एक आदेश काढला़या आदेशामध्ये शहरी व ग्रामीण अंगणवाडी केंद्रातून करण्यात येणारी आहार पुरवठा ही आवश्यक सेवा असून, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व केंद्र शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही परिस्थितीत बालकाची आहार पोषणाची सेवा बंद ठेवता येत नाही़ अशा परिस्थितीत तात्पुरत्या स्वरुपात व कायमस्वरुपी व्यवस्था होईपर्यंत अंगणवाडी केंद्राच्या आहार पुरवठ्याची सेवा किमान शासनाच्या इतर विभागातील नागरी व ग्रामीण स्थानिक कर्मचाºयांच्या सहाय्याने विनाखंड सुरळीत ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला़ तसेच आदेश जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाला दिले़ आदेश प्राप्त होऊन पाच दिवस उलटले आहेत़परंतु, या विभागाला अद्यापही १४४५ अंगणवाड्यांत पर्यायी व्यवस्था करण्यात यश आलेले नाही़ त्यामुळे १ हजार ४४५ अंगणवाड्या गेल्या १५ दिवसांपासून बंद आहेत़ परंतु, महिला व बालविकास विभागाला याचे सोयरसुतक राहिलेले नाही़ या विभागाच्या थंड कारभाराचा ० ते ६ वर्षे वयोगटातील जवळपास १ लाख बालकांना फटका बसला आहे़त्यामुळे या विभागाने तातडीने पावले उचलत पर्यायी व्यवस्था करावी किंवा अंगणवाडी सेविकांचा संप मिटविण्यासाठी शासनस्तरावर ठोस पावले उचलवीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़