शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

१४१ फुकट्या प्रवाशांना दंड

By admin | Updated: December 31, 2015 13:49 IST

विनातिकीट बसमधून प्रवास करणार्‍यांना आळा बसावा; व एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे

 

हिंगोली : विनातिकीट बसमधून प्रवास करणार्‍यांना आळा बसावा; व एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून त्यासाठी राज्यभरातील विविध विभागीय कार्यालयातंर्गत पथकाद्वारे कारवाई करण्यात येते. हिंगोलीसह आठ डेपोचे कामकाज परभणी येथील विभागीय कार्यालयातंर्गत सुरू असून १ एप्रिल ते नोव्हेंबर २0१५ अखेर पथकाने १४१ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्यासह वाहकांकडून २४ हजार ६४ रूपये दंड वसूल केला आहे. एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या जास्त असली तरी, आगाराच्या उत्पन्नात घट होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे कामचुकार अधिकारी-कर्मचारी तसेच विनातिकीट प्रवास करणारे प्रवाशांमुळे आगारास आर्थिक तोटा सहन करावा लागतो. राज्य परिवहन मंडळाकडून याला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यानुषंगाने विनातिकीट प्रवासी करणारे तसेच दोषी वाहकांवर कारवाई केल्या जात आहे. परभणी विभागीय कार्यालयातंर्गत जवळपास ७00 च्यावर चालक व वाहकांची संख्या आहे. त्यांच्यावर चार पथकाद्वारे नियंत्रण ठेवल्या जात आहे.  यासाठी रात्रीच्यावेळी २ तर दोन तर दिवसा दोन पथके कार्यरत असतात. एका पथकात पाच ५ अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असणे आवश्यक आहे. परंतु एका पथकामध्ये केवळ तीन अधिकारी-कर्मचार्‍यांचा सामावेश आहे. परिणामी, कामे गतीने होत नाहीत.  ५0 रूपये तिकीट रकमेच्यावर जर एखाद्या प्रवाशाने विनातिकीट बसमधून प्रवास केल्यास त्याला १0२ रूपये दंड व तिकिटाची पूर्ण रक्कम वसूल केल्या जाते. तर वाहकाला कारवाईचे स्वरूप लक्षात घेत दंड तसेच सहा महिने किंवा एका वर्षासाठी सेवेतून काढून टाकल्या जात असल्याची माहिती विभागीय कार्यालयाने दिली. परभणी कार्यालयातंर्गत हिंगोली, पाथरी, कळमनुरी, गंगाखेड, वसमत, परभणी यासह विविध डेपाचा कारभार चालतो. त्यांतर्गत वरीलप्रमाणे कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)/ अतिक्रमण काढणार हिंगोली बसस्थानक परिसरातील लवकरच अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडे २९ डिसेंबर २0१५ रोजी स्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी संरक्षण मागण्यात आले होते. परंतु ही तारीख पुढे ढकलली असून लवकरच अतिक्रमण हटविले जाणार असल्याची माहिती आगारातील संबधित अधिकार्‍याने दिली.

विनातिकीट प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास न करता त्यांनी राज्य परिवहन मंडळास सहकार्य करावे. तसेच वाहकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्तव्यावर हजर असताना बसमधील प्रत्येकाला तिकीट देण्याचे काम करणे अपेक्षित आहे. जेणेकरून एसटीच्या उत्पन्नात घट होणार नाही. तसेच प्रवाशांनीही वाहकांकडून आवश्यक अंतराचे तिकीट घेणे बंधनकारक आहे, असे विभागीय वाहतूक अधिकारी डी. बी. कसबे यांनी सांगितले.