शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

तब्बल १४ वर्षांनी झाली निर्दोष मुक्तता

By admin | Updated: May 20, 2014 01:33 IST

गंगापूर : शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या १३ जणांची तब्बल १४ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

गंगापूर : शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या १३ जणांची तब्बल १४ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गंगापूर तहसील कार्यालयात २००० साली उसाच्या पंचनाम्यावरून शेतकरी व तत्कालीन तहसीलदार यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीवरून १३ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यावेळी उपस्थित अप्पासाहेब माने, लक्ष्मण सांगळे, बबनराव जगताप, रमेश पाखरे यांनी व अन्य शेतकर्‍यांनी तहसीलारांना याबाबत जाब विचारला असता तहसीलदारांनी कथितरीत्या उद्धटपणाची वागणूक दिली. यावरून काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. शेतकर्‍यांची संख्या वाढत गेली. प्रकरण आपल्यावर शेकणार, या भीतीपोटी तहसीलदारांनी १३ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गंगापूर न्यायालयात सन २००० पासून आतापर्यंत खटला सुरू होता. १४ वर्षे या न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधितांची चौकशी करून साक्षीदार तपासल्यानंतर १२ लोकांना न्यायाधीश अ.उ. बहीर यांनी निर्दोष मुक्त केले. दरम्यानच्या काळात १३ लोकांपैकी एकाचे निधन झालेले होते. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. दत्तात्रय पानकडे, अ‍ॅड. एकनाथ पानकडे यांनी काम पाहिले. (वार्ताहर) उसाच्या नुकसानभरपाईचे प्रकरण त्या वर्षी गाळपाअभावी शेकडो एकरातील ऊस उभा होता. या उसाचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांची होती. याबाबत शासनानेदेखील उसाचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शासन आदेशावरून संबंधित शेतकर्‍यांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाईची रक्कमही तहसील कार्यालयात आलेली होती. ती रक्कम तहसीलच्या सुट्यांच्या अगोदर देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संतप्त झाले होते.