शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

जिल्ह्यात १४ लाख मोबाईलधारक

By admin | Updated: October 29, 2015 00:21 IST

राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येपैकी २४ लाख लोकांच्या हाती मोबाईल असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.

राजकुमार जोंधळे , लातूरजिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येपैकी २४ लाख लोकांच्या हाती मोबाईल असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे. विविध खाजगी कंपन्यांचे मोबाईल ग्राहक हे १२ लाख ७७ हजारांवर आहेत. तर सर्वात कमी भारत दूरसंचार निगमला ग्राहकांनी पसंती दिली आहे. मोबाईल स्पर्धेत बीएसएनएल मागे पडल्याचे दिसून येते. बीएसएनएलच्या सेवेला १ लाख २३ हजार लोकांनी पसंती दिली आहे.विशेष म्हणजे यात १९ हजार ५९६ लँडलाईन फोन वापरणाऱ्यांची संख्या आहे. अलिकडे प्रत्येकांच्या हाती मोबाईल आल्यामुळे लँडलाईन कालबाह्य होणार का? अशी भीती वाटत होती. मात्र अलिकडे हा आकडा वाढू लागला आहे. आजही लँडलाईन वापरणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण असल्याचे मानले जाते. आपल्या व्हीजेटिंग कार्डवर मोबाईल क्रमांकाबरोबर लँडलाईनचा क्रमांक असणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. गेल्या दहा वर्षापूर्वी हाच आकडा ८० हजारांच्या घरात होता. आता ७५ टक्के ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. बीएसएनएलने अलिकडे नव्या-नव्या योजना सुरु केल्या आहेत. मोबाईलच्या बाजारात खाजगी कंपन्यांची आर्थिक उलाढाल ही महिन्याकाठी जिल्हाभरात शेकडो कोटींच्या घरात आहे. खाजगी कंपन्यांची सेवा सुरु आहे. प्रत्येकांत मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत बीएसएनएलची मात्र सरकारी स्पर्धा आहे. या खाजगी कंपन्यांच्या मानाने बीएसएनएलकडे एवढी अत्याधुनिक यंत्रणा नाही. आहे त्या यंत्रणेवर बीएसएनएल आपला गाडा हाकत आहे. रोज नव्या-नव्या योजनांचा धमका सुरु करुन ग्राहकांच्या खिशातून कसा पैसा काढता येईल, यासाठी खाजगी कंपन्या विचार करतात. सध्याला खाजगी कंपन्यांत मोठी स्पर्धा आहे. प्रत्येकजण आपल्याच कंपनीकडून ग्राहकांचे हित साधले जाते, असा दावा करतो. ग्राहकांना विविध आॅफर देवून, आकर्षित केले जाते. या आकर्षणापोटी मोबाईल ग्राहक महिनाकाठी किमान सातशे ते हजार रुपये आलेल्या मोबाईल बिलावर खर्च करतो.