शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

एका महिन्यात १३३० कोरोना संशयितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप राज्यात सर्वत्र विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या आरोपात ...

औरंगाबाद : कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप राज्यात सर्वत्र विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या आरोपात काही प्रमाणात तथ्य असल्याचे आता समोर येत आहे. औरंगाबाद शहरात कोरोनामुळे तब्बल १७६२ नागरिकांचा फक्त एप्रिल महिन्यात मृत्यू झाला. कोरोनामुळे ४३२ तर १३३० जणांवर संशयित म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयितांचा आकडा एवढा कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एप्रिल महिन्यात मृत्यूच्या आकड्याने सर्वोच्च टोक गाठल्यासारखे दिसून येत आहे. या महिन्यात २ हजार ८५४ नागरिकांच्या मृत्यूची नोंद महापालिकेच्या दप्तरी करण्यात आलेली आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कधीच झाले नव्हते. दरवर्षी एप्रिल महिन्यात साधारणपणे ६०० ते ७०० नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येते. मात्र, यंदा सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. २ हजार ८५४ मध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ४३२ आहे. उर्वरित १ हजार ३३० नागरिकांची कोरोना संशयित म्हणून मृत्यू झाल्याची नोंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयित कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रुग्णांचा रिपोर्ट येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागत होता. त्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला संशयित असे घोषित केले जात होते. आता सकाळी लाळेचे नमुने दिले तर संध्याकाळी रिपोर्ट मिळत आहे. असे असतानाही एकट्या एप्रिल महिन्यात १३३० नागरिकांच्या मृत्यूची नोंद संशयित म्हणून घेतली. कोरोनाच्या मृत्यूचा खरा आकडा लपविण्यासाठी हा सर्व खटाटोप केला का? राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कोविड नसलेल्या अकराशे जणांचा मृत्यू

एप्रिल महिन्यात कोविड नसलेल्या १ हजार ९३ नागरिकांचा मृत्यू झाला. शहरातील वेगवेगळ्या स्मशानभूमी आणि कब्रस्तानात त्यांच्यावर विधी करण्यात आला. एप्रिल महिन्यात यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कधीच झाले नव्हते हे विशेष. २०१७ -५९९, २०१८-६७९, २०१९-७००, २०२०-६२१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

पॉझिटिव्ह नसले तरी काही रुग्ण संशयित असतात

काही कोरोना रुग्णांचा रिपोर्ट वारंवार तपासणी केली तरी निगेटिव्ह येतो. त्यांच्या शरीरात कोरोनाची लक्षणे असतात. मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह नसतो. त्यामुळे संबंधित रुग्णाला शेवटपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असे समजून उपचार करण्यात येतात. दुर्दैवाने रुग्ण दगावला तर त्याला संशयित म्हणून पुढील प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे संशयितांचा आकडा मोठा वाटत आहे.

डॉ. नीता पाडळकर आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.