शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

एका महिन्यात १३३० कोरोना संशयितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप राज्यात सर्वत्र विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या आरोपात ...

औरंगाबाद : कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप राज्यात सर्वत्र विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या आरोपात काही प्रमाणात तथ्य असल्याचे आता समोर येत आहे. औरंगाबाद शहरात कोरोनामुळे तब्बल १७६२ नागरिकांचा फक्त एप्रिल महिन्यात मृत्यू झाला. कोरोनामुळे ४३२ तर १३३० जणांवर संशयित म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयितांचा आकडा एवढा कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एप्रिल महिन्यात मृत्यूच्या आकड्याने सर्वोच्च टोक गाठल्यासारखे दिसून येत आहे. या महिन्यात २ हजार ८५४ नागरिकांच्या मृत्यूची नोंद महापालिकेच्या दप्तरी करण्यात आलेली आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कधीच झाले नव्हते. दरवर्षी एप्रिल महिन्यात साधारणपणे ६०० ते ७०० नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येते. मात्र, यंदा सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. २ हजार ८५४ मध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ४३२ आहे. उर्वरित १ हजार ३३० नागरिकांची कोरोना संशयित म्हणून मृत्यू झाल्याची नोंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयित कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रुग्णांचा रिपोर्ट येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागत होता. त्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला संशयित असे घोषित केले जात होते. आता सकाळी लाळेचे नमुने दिले तर संध्याकाळी रिपोर्ट मिळत आहे. असे असतानाही एकट्या एप्रिल महिन्यात १३३० नागरिकांच्या मृत्यूची नोंद संशयित म्हणून घेतली. कोरोनाच्या मृत्यूचा खरा आकडा लपविण्यासाठी हा सर्व खटाटोप केला का? राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कोविड नसलेल्या अकराशे जणांचा मृत्यू

एप्रिल महिन्यात कोविड नसलेल्या १ हजार ९३ नागरिकांचा मृत्यू झाला. शहरातील वेगवेगळ्या स्मशानभूमी आणि कब्रस्तानात त्यांच्यावर विधी करण्यात आला. एप्रिल महिन्यात यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कधीच झाले नव्हते हे विशेष. २०१७ -५९९, २०१८-६७९, २०१९-७००, २०२०-६२१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

पॉझिटिव्ह नसले तरी काही रुग्ण संशयित असतात

काही कोरोना रुग्णांचा रिपोर्ट वारंवार तपासणी केली तरी निगेटिव्ह येतो. त्यांच्या शरीरात कोरोनाची लक्षणे असतात. मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह नसतो. त्यामुळे संबंधित रुग्णाला शेवटपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असे समजून उपचार करण्यात येतात. दुर्दैवाने रुग्ण दगावला तर त्याला संशयित म्हणून पुढील प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे संशयितांचा आकडा मोठा वाटत आहे.

डॉ. नीता पाडळकर आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.