शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात १३३० कोरोना संशयितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप राज्यात सर्वत्र विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या आरोपात ...

औरंगाबाद : कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप राज्यात सर्वत्र विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या आरोपात काही प्रमाणात तथ्य असल्याचे आता समोर येत आहे. औरंगाबाद शहरात कोरोनामुळे तब्बल १७६२ नागरिकांचा फक्त एप्रिल महिन्यात मृत्यू झाला. कोरोनामुळे ४३२ तर १३३० जणांवर संशयित म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयितांचा आकडा एवढा कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एप्रिल महिन्यात मृत्यूच्या आकड्याने सर्वोच्च टोक गाठल्यासारखे दिसून येत आहे. या महिन्यात २ हजार ८५४ नागरिकांच्या मृत्यूची नोंद महापालिकेच्या दप्तरी करण्यात आलेली आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कधीच झाले नव्हते. दरवर्षी एप्रिल महिन्यात साधारणपणे ६०० ते ७०० नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येते. मात्र, यंदा सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. २ हजार ८५४ मध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ४३२ आहे. उर्वरित १ हजार ३३० नागरिकांची कोरोना संशयित म्हणून मृत्यू झाल्याची नोंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयित कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रुग्णांचा रिपोर्ट येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागत होता. त्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला संशयित असे घोषित केले जात होते. आता सकाळी लाळेचे नमुने दिले तर संध्याकाळी रिपोर्ट मिळत आहे. असे असतानाही एकट्या एप्रिल महिन्यात १३३० नागरिकांच्या मृत्यूची नोंद संशयित म्हणून घेतली. कोरोनाच्या मृत्यूचा खरा आकडा लपविण्यासाठी हा सर्व खटाटोप केला का? राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कोविड नसलेल्या अकराशे जणांचा मृत्यू

एप्रिल महिन्यात कोविड नसलेल्या १ हजार ९३ नागरिकांचा मृत्यू झाला. शहरातील वेगवेगळ्या स्मशानभूमी आणि कब्रस्तानात त्यांच्यावर विधी करण्यात आला. एप्रिल महिन्यात यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कधीच झाले नव्हते हे विशेष. २०१७ -५९९, २०१८-६७९, २०१९-७००, २०२०-६२१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

पॉझिटिव्ह नसले तरी काही रुग्ण संशयित असतात

काही कोरोना रुग्णांचा रिपोर्ट वारंवार तपासणी केली तरी निगेटिव्ह येतो. त्यांच्या शरीरात कोरोनाची लक्षणे असतात. मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह नसतो. त्यामुळे संबंधित रुग्णाला शेवटपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असे समजून उपचार करण्यात येतात. दुर्दैवाने रुग्ण दगावला तर त्याला संशयित म्हणून पुढील प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे संशयितांचा आकडा मोठा वाटत आहे.

डॉ. नीता पाडळकर आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.