शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

१३३ कोटींनी औरंगाबादची ‘एसटी’ खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या लाटेपाठाेपाठ दुसऱ्या लाटेतही ‘एसटी’च्या वाहतुकीवर निर्बंध लागले. परिणामी, जिल्ह्यात महामंडळाची ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या लाटेपाठाेपाठ दुसऱ्या लाटेतही ‘एसटी’च्या वाहतुकीवर निर्बंध लागले. परिणामी, जिल्ह्यात महामंडळाची बस ठप्प झाली. कोरोनाच्या गेल्या १४ महिन्यांत एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला २६८ दिवस रोज ५० लाखांच्या नुकसानीला ताेंड द्यावे लागले. यातून तब्बल १३३ कोटींनी औरंगाबादची ‘एसटी’ खड्ड्यात गेली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी वाहतुकीवर निर्बंध गरजेचे आहेत; पण त्यासाठी ‘एसटी’ला कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासनाने २३ मार्चपासून लाॅकडाऊन जारी केले हाेते. परिणामी, एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती. त्यानंतर पुढील ५ महिने एसटीची सेवा रुळावर येत नाही तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यामुळे ‘एसटी’च्या वाहतुकीवर पुन्हा निर्बंध आले. अत्यावश्यक सेवेसाठीच ‘एसटी’ला मुभा देण्यात आली. ‘एसटी’ने मालवाहतूकही सुरू केली; परंतु त्यातून ‘एसटी’चे कोट्यवधी रुपयांचे नुकसान भरून निघेल, अशी स्थिती नाही.

वैयक्तिक वाहनांनी प्रवासावर भर

गतवर्षी ऑक्टोबरपासून एसटीची सेवा सुरळीत झाली. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक वाहनांनी प्रवास करण्यावर भर दिला. जुन्या चारचाकी खरेदीचे प्रमाण वाढले. त्यामुळे ‘एसटी’ची प्रवासी संख्या कमी झाली. डिझेल भरण्यासाठीही पैसे नसल्याची स्थिती काही आगारांची झाली होती. अशा परिस्थितीत गतवर्षी २२३ आणि यावर्षी मागील ४५ दिवस एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला आर्थिक फटका बसला. जिल्ह्यात एसटी महामंडळाचे तब्बल २ हजार ९०० कर्मचारी आहे.

---

जिल्ह्यातील ‘एसटी’च्या नुुकसानीची स्थिती

- वर्ष २०२०

-नुकसानीचे दिवस - २२३

-एकूण नुकसान - १११ कोटी

-------

- वर्ष २०२१

- नुकसानीचे दिवस - ४५

- एकूण नुकसान - २३ कोटी

-------

-

जिल्ह्यातील स्थिती

- एकूण बस - ५५०

- चालक - १,२१३

- वाहक - ९३१

- एकूण कर्मचारी - २,९००

- कोरोनापूर्वी रोजच्या फेऱ्या - ६,२२२

-----

एकट्या मध्यवर्ती बसस्थानकाची स्थिती

- रोजचे नुकसान - १५ ते २० लाख रुपये

- चालक - २५६

- वाहक - १७७

- एकूण कर्मचारी - ५५३

-------

रोज ५० लाख रुपयांचे नुकसान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लाॅकडाऊन हाेते. जवळपास २२३ दिवस बससेवेवर परिणाम झाला. यातून १११ कोटींचे नुकसान झाले. यावर्षी गेल्या ४५ दिवसांत २२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कालावधीत प्रत्येक दिवसाला साधारण ५० लाख रुपयांचे नुकसान झाले.

-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ