शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

१३ टक्के पाऊस

By admin | Updated: August 20, 2014 23:54 IST

परभणी : यावर्षी जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे़

परभणी : यावर्षी जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे़ अर्धा पावसाळा सरल्यानंतरही केवळ १३ टक्के पाऊस जिल्ह्यात झाल्याने पिकांबरोबरच पाण्याचा प्रश्न तीव्र बनत चालला आहे़जिल्ह्यात सरासरी ७५० मिमी पाऊस होतो़ आतापर्यंतचा इतिहास पाहता पावसाळ्यात जरी ताण पडला तरी संपूर्ण वर्षभरात सरासरी गाठली जाते़ त्यामुळे पाण्याचा तसा प्रश्न उद्भवत नाही़ परंतु, यावर्षी मात्र आतापर्यंतच्या पावसाळ्यांशी तुलना करता खूपच कमी पाऊस झालेला आहे़ केवळ १३ टक्के पाऊस झाल्याने पिके तर माना टाकू लागली आहेत़ जमिनीची पाणी पातळी देखील खोल जात असल्याने दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे़ प्रकल्प आणि धरणांमधील पाणी पातळी देखील तळ गाठू लागली आहे़ पावसाळ्यातील पाण्याचा संचय झाल्यानंतर उन्हाळ्यात हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते़ परंतु, पावसाळ्यातच धरण आणि प्रकल्पांनी तळ गाठल्यामुळे आगामी काळातील प्रश्न अधिकच गंभीर दिसू लागला आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत १३५़९३ मिमी पाऊस झाला़ सेलू तालुक्यात सर्वाधिक १५५़८ मिमी तर पालम तालुक्यात सर्वात कमी १०५ मिमी पाऊस झाला़ मागच्या वर्षी हीच परिस्थिती उलटी होती़ जिल्ह्यात ६१०़६३ मिमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत ९० टक्के पाऊस झाला होता़ परंतु, यावर्षी मात्र केवळ १३ टक्केच पाऊस झाल्याने आगामी काळातील संकट डोळ्यासमोर दिसू लागले आहे़ आठवडाभरापासून वातावरणात बदल झाला आहे़ पाऊस जरी होत नसला तरी ढगाळ वातावरण निर्माण होते़ परिणामी उकाडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ त्यामुळे उन्हाळ्यापेक्षाही बिकट स्थितीतून जिल्हावासिय जात आहेत़ (प्रतिनिधी)वेधशाळेचा आशादायक अंदाजपुणे येथील भारतीय वेधशाळेने आगामी चार दिवसांत मराठवाड्यामध्ये पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे़ त्यामुळे हा अंदाज आशादायक वाटू लागला आहे़ वेधशाळेच्या या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात ६१ मिमी, लातूर १०० मिमी, नांदेड ८१ मिमी, औरंगाबाद ३२ मिमी, हिंगोली ५८ मिमी, बीड ६७ मिमी आणि जालना जिल्ह्यामध्ये ३८ मिमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे़ या अंदाजानुसार पावसाचे पुनरागमन व्हावे, अशीच प्रार्थना जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत़ टंचाईग्रस्त गावे वाढलीपावसाळ्यामध्येच पाण्याची टंचाई निर्माण होत आहे़ मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही ही समस्या जाणवू लागली आहे़ दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत चालली असल्याने या संदर्भात प्रशासनाला तातडीने उपाययोजना करावी लागणार आहे़