शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

१३ टक्के पाऊस

By admin | Updated: August 20, 2014 23:54 IST

परभणी : यावर्षी जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे़

परभणी : यावर्षी जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे़ अर्धा पावसाळा सरल्यानंतरही केवळ १३ टक्के पाऊस जिल्ह्यात झाल्याने पिकांबरोबरच पाण्याचा प्रश्न तीव्र बनत चालला आहे़जिल्ह्यात सरासरी ७५० मिमी पाऊस होतो़ आतापर्यंतचा इतिहास पाहता पावसाळ्यात जरी ताण पडला तरी संपूर्ण वर्षभरात सरासरी गाठली जाते़ त्यामुळे पाण्याचा तसा प्रश्न उद्भवत नाही़ परंतु, यावर्षी मात्र आतापर्यंतच्या पावसाळ्यांशी तुलना करता खूपच कमी पाऊस झालेला आहे़ केवळ १३ टक्के पाऊस झाल्याने पिके तर माना टाकू लागली आहेत़ जमिनीची पाणी पातळी देखील खोल जात असल्याने दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे़ प्रकल्प आणि धरणांमधील पाणी पातळी देखील तळ गाठू लागली आहे़ पावसाळ्यातील पाण्याचा संचय झाल्यानंतर उन्हाळ्यात हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते़ परंतु, पावसाळ्यातच धरण आणि प्रकल्पांनी तळ गाठल्यामुळे आगामी काळातील प्रश्न अधिकच गंभीर दिसू लागला आहे़ जिल्ह्यात आजपर्यंत १३५़९३ मिमी पाऊस झाला़ सेलू तालुक्यात सर्वाधिक १५५़८ मिमी तर पालम तालुक्यात सर्वात कमी १०५ मिमी पाऊस झाला़ मागच्या वर्षी हीच परिस्थिती उलटी होती़ जिल्ह्यात ६१०़६३ मिमी म्हणजे सरासरीच्या तुलनेत ९० टक्के पाऊस झाला होता़ परंतु, यावर्षी मात्र केवळ १३ टक्केच पाऊस झाल्याने आगामी काळातील संकट डोळ्यासमोर दिसू लागले आहे़ आठवडाभरापासून वातावरणात बदल झाला आहे़ पाऊस जरी होत नसला तरी ढगाळ वातावरण निर्माण होते़ परिणामी उकाडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ त्यामुळे उन्हाळ्यापेक्षाही बिकट स्थितीतून जिल्हावासिय जात आहेत़ (प्रतिनिधी)वेधशाळेचा आशादायक अंदाजपुणे येथील भारतीय वेधशाळेने आगामी चार दिवसांत मराठवाड्यामध्ये पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे़ त्यामुळे हा अंदाज आशादायक वाटू लागला आहे़ वेधशाळेच्या या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात ६१ मिमी, लातूर १०० मिमी, नांदेड ८१ मिमी, औरंगाबाद ३२ मिमी, हिंगोली ५८ मिमी, बीड ६७ मिमी आणि जालना जिल्ह्यामध्ये ३८ मिमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे़ या अंदाजानुसार पावसाचे पुनरागमन व्हावे, अशीच प्रार्थना जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत़ टंचाईग्रस्त गावे वाढलीपावसाळ्यामध्येच पाण्याची टंचाई निर्माण होत आहे़ मोठ्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही ही समस्या जाणवू लागली आहे़ दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत चालली असल्याने या संदर्भात प्रशासनाला तातडीने उपाययोजना करावी लागणार आहे़