शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

१३ जणांची घाटीकडून सफाईगारपदी नियुक्ती

By admin | Updated: September 15, 2014 00:40 IST

औरंगाबाद : वाल्मिकी समाजातील तरुणांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईगारपदासाठी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या ३९ पैकी १३ जणांना घाटी प्रशासनाने नियुक्तीपत्रे दिली.

औरंगाबाद : वाल्मिकी समाजातील तरुणांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईगारपदासाठी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या ३९ पैकी १३ जणांना घाटी प्रशासनाने नियुक्तीपत्रे दिली. या कर्मचाऱ्यांना सध्या २९ दिवसांच्या करारावर नोकरी देण्यात आली आहे. त्यांच्या चारित्र्य पडताळणीचा अहवाल आल्यानंतरच त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सुमारे १४९ पदे रिक्त आहेत. यात बहुतेक पदे ही सफाईगारांची आहेत. घाटीतील ५० टक्के कर्मचाऱ्यांनी वयाची पन्नाशी ओलांडलेली आहे. शिवाय अनेक कर्मचारी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, टी. बी. इत्यादी. आजारांनी त्रस्त आहेत. तर अनेक जण व्यसनी आहेत. त्यामुळे घाटीच्या स्वच्छतेच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास परवानगी द्यावी, याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, शासनाने एक अध्यादेश काढून लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार अर्ज करणाऱ्या तरुणांना नियुक्त्या देण्याचे कळविले होते. घाटी प्रशासनाने त्याकरिता निवड समिती स्थापन केली. समितीने प्राप्त अर्जांची छाननी केली. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आदींचा विचार करून ३९ अर्ज वैध ठरविले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १३ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. या उमेदवारांना सध्या २९ दिवसांची नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा शल्यचिकित्सकांकडून शारीरिक वैद्यकीय तपासणी अहवाल आणि पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागविण्यात आला आहे. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना सरळसेवा भरती प्रक्रियेनुसार कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.