शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत १३ विद्युत, गॅसदाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे दररोज शंभराहून अधिक मृत्यू होत असल्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. मृतदेहाची अवहेलना होत ...

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे दररोज शंभराहून अधिक मृत्यू होत असल्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. मृतदेहाची अवहेलना होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्युतदाहिनी सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उस्मानाबाद, परभणी वगळता उर्वरित औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये महिनाभरात दाहिन्या कार्यान्वित होणार आहेत.

नांदेडमध्ये ३, लातूरमध्ये २, उदगीरमध्ये १, हिंगोली १, जालन्यात १, औरंगाबादमध्ये ४ आणि बीडमध्ये १ अशा १३ विद्युत व गॅसदाहिन्या होतील. परभणी आणि उस्मानाबादसाठी लवकरच निर्णय होणार आहे. बीडमध्ये तांत्रिक अडचण आहे, ती पूर्ण होईल. बाकीच्या जिल्ह्यात लवकरच काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. एका रुग्णवाहिकेत एकावर एक रचून अनेक मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले होते. या प्रकारानंतर प्रशासकीय यंत्रणेने विद्युत, गॅसदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीला मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त जगदीश मिनीयार, औरंगाबाद फर्स्टचे प्रीतीश चटर्जी, मसिआचे अभय हंचनाळ, सीएमआयएचे सतीश लोणीकर, सीआयआय रमण अजगांवकर उपस्थित होते.

वर्षभरापासून कोरोना महामारी सुरू असून, चार महिन्यांपासून दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे. या लाटेत रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, विभागात दररोज १०० ते १५० बाधितांचा मृत्यू होत आहे. औरंगाबाद, नांदेडसारख्या जिल्ह्यांत दिवसाला २५ ते ३० रुग्ण दगावत आहेत.

स्मशानभूमीत सगळे कुटुंब राबते

कोरोनाने दगावलेल्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे थेट स्मशानभूमीत नेला जातो. बऱ्याच ठिकाणी कुटुंबातील सदस्य अंत्यविधीला नसतात. स्मशानभूमीत मृतदेह येत असल्याने जागेअभावी अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. शिवाय स्मशानजोगींचे पूर्ण कुटुंब दिवसरात्र काम करीत आहे. महिला, मुलेदेखील मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी परिश्रम घेतात. या सगळ्या परिस्थितीवर गॅस आणि विद्युतदाहिनी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.