शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दोन महिन्यांत १२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात २०२१ सालाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यांत ...

औरंगाबाद : मराठवाड्यात २०२१ सालाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यांत आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. गतवर्षी याच काळात १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या वर्षी १२७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

जानेवारी २०२१ मध्ये ५७, तर फेब्रुवारीत ७० अशा एकूण १२७ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपविली. औरंगाबादेत २६, जालना ११, परभणी १०, हिंगोली ४, नांदेड १७, बीड ३०, लातूर १३ आणि उस्मानाबादमधील १६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

गेले दोन पावसाळे मराठवाड्यात चांगले बरसले; मात्र अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. गेल्या पावसाळ्यात खरीप हंगामातील व यंदा गेल्या महिन्यात रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने केले. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी हा सगळा नैसर्गिक खेळ शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत असून, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३९ घटना शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. ८७ घटनांची चौकशी सुरू आहे, तर १ प्रकरण अपात्र ठरले आहे. गेल्या वर्षी ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांतील ६१७ प्रकरणांत मदत करण्यात आली. ११० प्रकरणे अपात्र ठरविली तर ४६ प्रकरणांत चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.