शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

दोन महिन्यांत १२७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात २०२१ सालाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यांत ...

औरंगाबाद : मराठवाड्यात २०२१ सालाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यांत आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. गतवर्षी याच काळात १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या वर्षी १२७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

जानेवारी २०२१ मध्ये ५७, तर फेब्रुवारीत ७० अशा एकूण १२७ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपविली. औरंगाबादेत २६, जालना ११, परभणी १०, हिंगोली ४, नांदेड १७, बीड ३०, लातूर १३ आणि उस्मानाबादमधील १६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

गेले दोन पावसाळे मराठवाड्यात चांगले बरसले; मात्र अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. गेल्या पावसाळ्यात खरीप हंगामातील व यंदा गेल्या महिन्यात रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने केले. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी हा सगळा नैसर्गिक खेळ शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत असून, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३९ घटना शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. ८७ घटनांची चौकशी सुरू आहे, तर १ प्रकरण अपात्र ठरले आहे. गेल्या वर्षी ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांतील ६१७ प्रकरणांत मदत करण्यात आली. ११० प्रकरणे अपात्र ठरविली तर ४६ प्रकरणांत चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.