शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत मालवाहतूकदारांच्या संपामुळे १२५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:41 IST

ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे.

ठळक मुद्देउद्योगांचा कच्चामाल संपला : संप मालवाहतूकदारांचा; कंपन्यांचा ‘चक्का जाम’

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे.वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकसह विविध कंपन्यांतून वर्षभरात उत्पादनांतून सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी २० जुलैपासून संप पुकारला आहे. सलग सहाव्या दिवशी बुधवारी (दि.२५) मालवाहतूकदारांचा संप कायम होता. या संपाची सर्वाधिक झळ जिल्ह्यातील उद्योगांना सहन करावी लागत आहे. शहर आणि परिसरातील कंपन्यांना सहा दिवसांपासून कच्च्या मालाचा पुरवठा झालेला नाही. औद्योगिक वसाहतीत दररोज २ हजार ट्रकमधून जवळपास ३२ हजार टन कच्चामाल दाखल होत असतो. तामिळनाडू, गुजरात, चेन्नई आदी शहरांतून हा कच्चामाल शहरात दाखल होत असतो. सहा दिवसांत जवळपास १ लाख ९२ हजार टन माल दाखल झालेला नाही. त्यामुळे उत्पादनांवर परिणाम झाला आहे.बहुतांश कंपन्यांमध्ये किमान दोन दिवसांचा कच्चामाल असतो. त्यामुळे पहिले दोन दिवस कंपन्यांवर संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मालवाहतूकदारांचे ‘चक्का जाम’ आंदोलन लांबल्याने कंपन्यांवरील परिणामाची तीव्रता वाढली आहे. बहुतांशकंपन्यांना कच्च्या मालाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काम असून, उद्योग बंद ठेवण्याची नामुष्की कंपन्यांवर ओढावत आहे. मोठे, मध्यम आणि लघु उद्योग आणि उद्योजक आर्थिक नुकसानीला तोंड देत आहेत. कच्च्या मालाअभावी २४ तास चालणारी यंत्रे (असेंब्ली लाईन) थांबवावी लागत आहे. छोट्या-छोट्या वाहनांनी कच्चामाल मिळवून उद्योग सुरू ठेवण्याची धडपड केली जात आहे. परंतु हा प्रयत्न अपुरा पडत आहे. वाळूज येथील कंपन्यांतील उत्पादनांवर सर्वाधिक परिणाम होत आहे. संप अधिक लांबला तर उद्योगांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.सहा दिवसांमध्ये कंपन्यांतील तयार झालेला मालही पडून आहे. त्यामुळे उत्पादनापोटी उद्योगांत येणारे कोट्यवधी रुपयेदेखील अडकू न पडले आहेत. एका उद्योगावर परिणाम झाल्याने त्यावर निगडित लघु उद्योगांची साखळी विस्कळीत झाली आहे.१५ टक्क्यांनी उत्पादन घटलेकच्च्या मालाअभावी कंपन्यांमध्ये १५ टक्क्यांनी उत्पादनात घट झाली आहे. क च्च्या मालाअभावी उद्योगातील यंत्रे बंद पडत आहेत, अशी माहिती ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांनी दिली. मालवाहतूकदारांच्या संपाने सहा दिवसांमध्ये जवळपास १२५ कोटींचा भुर्दंड उद्योगांना सहन करावा लागला.उद्योग संघटनांची शासनाकडे मागणीमालवाहतूकदारांचा संप लांबल्याने उद्योग क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे. संपामुळे उत्पादनांवर परिणाम होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे ‘सीएमआयए’ व ‘मसिआ’ संघटनेतर्फे सांगण्यात आले.संपाने जिल्ह्यातइंधन विक्रीत घटमालवाहतूकदारांच्या संपाने सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुमारे ३ हजाट ट्रक बंद असल्याने डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल पंपचालकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील महामार्गांवर जवळपास २०० पंप आहेत. संपाने इंधन विक्रीवर परिणाम झाल्याचे औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अखिल अब्बास यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी