शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत मालवाहतूकदारांच्या संपामुळे १२५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:41 IST

ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे.

ठळक मुद्देउद्योगांचा कच्चामाल संपला : संप मालवाहतूकदारांचा; कंपन्यांचा ‘चक्का जाम’

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे.वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकसह विविध कंपन्यांतून वर्षभरात उत्पादनांतून सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी २० जुलैपासून संप पुकारला आहे. सलग सहाव्या दिवशी बुधवारी (दि.२५) मालवाहतूकदारांचा संप कायम होता. या संपाची सर्वाधिक झळ जिल्ह्यातील उद्योगांना सहन करावी लागत आहे. शहर आणि परिसरातील कंपन्यांना सहा दिवसांपासून कच्च्या मालाचा पुरवठा झालेला नाही. औद्योगिक वसाहतीत दररोज २ हजार ट्रकमधून जवळपास ३२ हजार टन कच्चामाल दाखल होत असतो. तामिळनाडू, गुजरात, चेन्नई आदी शहरांतून हा कच्चामाल शहरात दाखल होत असतो. सहा दिवसांत जवळपास १ लाख ९२ हजार टन माल दाखल झालेला नाही. त्यामुळे उत्पादनांवर परिणाम झाला आहे.बहुतांश कंपन्यांमध्ये किमान दोन दिवसांचा कच्चामाल असतो. त्यामुळे पहिले दोन दिवस कंपन्यांवर संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मालवाहतूकदारांचे ‘चक्का जाम’ आंदोलन लांबल्याने कंपन्यांवरील परिणामाची तीव्रता वाढली आहे. बहुतांशकंपन्यांना कच्च्या मालाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काम असून, उद्योग बंद ठेवण्याची नामुष्की कंपन्यांवर ओढावत आहे. मोठे, मध्यम आणि लघु उद्योग आणि उद्योजक आर्थिक नुकसानीला तोंड देत आहेत. कच्च्या मालाअभावी २४ तास चालणारी यंत्रे (असेंब्ली लाईन) थांबवावी लागत आहे. छोट्या-छोट्या वाहनांनी कच्चामाल मिळवून उद्योग सुरू ठेवण्याची धडपड केली जात आहे. परंतु हा प्रयत्न अपुरा पडत आहे. वाळूज येथील कंपन्यांतील उत्पादनांवर सर्वाधिक परिणाम होत आहे. संप अधिक लांबला तर उद्योगांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.सहा दिवसांमध्ये कंपन्यांतील तयार झालेला मालही पडून आहे. त्यामुळे उत्पादनापोटी उद्योगांत येणारे कोट्यवधी रुपयेदेखील अडकू न पडले आहेत. एका उद्योगावर परिणाम झाल्याने त्यावर निगडित लघु उद्योगांची साखळी विस्कळीत झाली आहे.१५ टक्क्यांनी उत्पादन घटलेकच्च्या मालाअभावी कंपन्यांमध्ये १५ टक्क्यांनी उत्पादनात घट झाली आहे. क च्च्या मालाअभावी उद्योगातील यंत्रे बंद पडत आहेत, अशी माहिती ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांनी दिली. मालवाहतूकदारांच्या संपाने सहा दिवसांमध्ये जवळपास १२५ कोटींचा भुर्दंड उद्योगांना सहन करावा लागला.उद्योग संघटनांची शासनाकडे मागणीमालवाहतूकदारांचा संप लांबल्याने उद्योग क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे. संपामुळे उत्पादनांवर परिणाम होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे ‘सीएमआयए’ व ‘मसिआ’ संघटनेतर्फे सांगण्यात आले.संपाने जिल्ह्यातइंधन विक्रीत घटमालवाहतूकदारांच्या संपाने सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुमारे ३ हजाट ट्रक बंद असल्याने डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल पंपचालकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील महामार्गांवर जवळपास २०० पंप आहेत. संपाने इंधन विक्रीवर परिणाम झाल्याचे औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अखिल अब्बास यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी