शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

१,२४९ गावे टंचाईच्या फेऱ्यात

By admin | Updated: June 23, 2014 00:31 IST

औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आतापर्यंत विभागातील १,२४९ गावे पाणीटंचाईच्या फेऱ्यात सापडली आहेत.

औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आतापर्यंत विभागातील १,२४९ गावे पाणीटंचाईच्या फेऱ्यात सापडली आहेत. यातील ६५० गावांना टँकरने, तर उर्वरित गावांना विहीर अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या या आठवड्यात तब्बल ५२६ वर पोहोचली आहे. मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली होती. मात्र, आता ही टंचाई आणखी भीषण झाली आहे. त्यात पाऊस लांबल्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात मराठवाड्यात ८९३ गावांमध्ये टंचाई होती. या आठवड्यात ही संख्या १,२४९ झाली आहे. सध्या विभागात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५०० गावे आणि वाड्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठी आहे. विभागातील ६५० गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २३३ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील १५४ गावांना या टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. बीड जिल्ह्यातही १७२ टँकर सुरू असून त्या ठिकाणी १४८ गावे आणि २११ वाड्यांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. परभणी जिल्ह्यात मात्र अद्याप टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही. अनेक ठिकाणी गावातच विहीर अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत विभागात ८४१ गावांमध्ये एकूण १,०५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी २६२ विहिरी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. उर्वरित विहिरी या त्या त्या गावातच असल्यामुळे नागरिकांना त्यावरूनच पाणी भरता येत आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३७४ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २८४, लातूर जिल्ह्यात १०६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. टँकरची संख्याजिल्हाटँकरऔरंगाबाद२३३जालना२८परभणी००हिंगोली०१नांदेड२०बीड१७२लातूर०७उस्मानाबाद६५एकूण५२६