शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

खर्चाअभावी १२ कोटींचा निधी अन्यत्र वर्ग !

By admin | Updated: April 2, 2017 23:45 IST

लातूर : शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर करण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने जिल्ह्यातील सातपेक्षा जास्त विभागांतील १२ कोटींपेक्षा जास्त निधी अखर्चित राहिला आहे

लातूर : शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर करण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने जिल्ह्यातील सातपेक्षा जास्त विभागांतील १२ कोटींपेक्षा जास्त निधी अखर्चित राहिला आहे. मार्चअखेरीस हा निधी पुन्हा शासनाकडे परत जाऊ नये म्हणून तो मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेस समर्पित करण्यात आला आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तळागाळातील नागरिकांनाही लाभ व्हावा, यासाठी दरवर्षी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून उपलब्ध केला जातो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक योजनेसाठी आगामी वर्षात किती निधी अपेक्षित आहे, त्याचे नियोजन त्यापूर्वीच केले जाते. या नियोजनानुसार शासनाकडून कमी-जास्त प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. लातूर जिल्ह्यासाठी सन २०१५-१६ मध्ये १८३ कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध झाले होते. तर सन २०१६-१७ या वर्षासाठी २०० कोटी ४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. सन २०१५-१६ च्या तुलनेत सन २०१६-१७ मध्ये शासनाकडून १७ कोटी ४ लाख रुपये अधिक उपलब्ध झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक विभागास पुरेसा निधी मिळून या विभागांतर्गतच्या योजना राबविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जिल्ह्यातील सात विभागांचे नियोजनच कोलमडल्याचे मार्चअखेरीस दिसून आले आहे. त्यामुळे या विभागातील उर्वरित निधी पुन्हा शासनाकडे परत जाण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान, हा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी समर्पित करण्यात आला आहे. निधी जिल्ह्यासाठीच राहिला असला, तरी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची मात्र तूट झाली आहे. वास्तविक पाहता खर्चाचे नियोजन वर्षभरापूर्वी होत असते. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे या निधीचा पुरेपूर उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध असतानाही त्याचा लाभ सामान्यांना मिळण्यास अडचण येते. (प्रतिनिधी)