शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

खर्चाअभावी १२ कोटींचा निधी अन्यत्र वर्ग !

By admin | Updated: April 2, 2017 23:45 IST

लातूर : शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर करण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने जिल्ह्यातील सातपेक्षा जास्त विभागांतील १२ कोटींपेक्षा जास्त निधी अखर्चित राहिला आहे

लातूर : शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर करण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने जिल्ह्यातील सातपेक्षा जास्त विभागांतील १२ कोटींपेक्षा जास्त निधी अखर्चित राहिला आहे. मार्चअखेरीस हा निधी पुन्हा शासनाकडे परत जाऊ नये म्हणून तो मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेस समर्पित करण्यात आला आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तळागाळातील नागरिकांनाही लाभ व्हावा, यासाठी दरवर्षी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून उपलब्ध केला जातो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक योजनेसाठी आगामी वर्षात किती निधी अपेक्षित आहे, त्याचे नियोजन त्यापूर्वीच केले जाते. या नियोजनानुसार शासनाकडून कमी-जास्त प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. लातूर जिल्ह्यासाठी सन २०१५-१६ मध्ये १८३ कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध झाले होते. तर सन २०१६-१७ या वर्षासाठी २०० कोटी ४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. सन २०१५-१६ च्या तुलनेत सन २०१६-१७ मध्ये शासनाकडून १७ कोटी ४ लाख रुपये अधिक उपलब्ध झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक विभागास पुरेसा निधी मिळून या विभागांतर्गतच्या योजना राबविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जिल्ह्यातील सात विभागांचे नियोजनच कोलमडल्याचे मार्चअखेरीस दिसून आले आहे. त्यामुळे या विभागातील उर्वरित निधी पुन्हा शासनाकडे परत जाण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान, हा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी समर्पित करण्यात आला आहे. निधी जिल्ह्यासाठीच राहिला असला, तरी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची मात्र तूट झाली आहे. वास्तविक पाहता खर्चाचे नियोजन वर्षभरापूर्वी होत असते. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे या निधीचा पुरेपूर उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध असतानाही त्याचा लाभ सामान्यांना मिळण्यास अडचण येते. (प्रतिनिधी)