शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

११७ गावांत तिव्र पाणीटंचाई

By admin | Updated: November 22, 2015 23:42 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होेत असून नागरीकांना अनेक आडचणीला सामोरे जावे लागत आहे़ १०७ ठिकाणी अधिगृहणे करूर ११७

लातूर : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होेत असून नागरीकांना अनेक आडचणीला सामोरे जावे लागत आहे़ १०७ ठिकाणी अधिगृहणे करूर ११७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे तर ४५ गावांत ४६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़ तरीही पाणीप्रश्न मार्गी लागत नसल्याने अनेक पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़लातूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, अहमदपुर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर, देवणी आदी तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी २१९ गावात ३३२ ठिकाणी अधिगृहणाची मागणी करण्यात आली आहे तर १६६ गावांतील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी २०५ टँकरची मागणी करण्यात आली आहे़ टँकर व अधिग्रहणाचे प्रस्ताव मोठ्या संख्येने असतानाही पाणीटंचाईची तिव्रता लक्षात घेऊन अधिग्रहणाला व टँकरला जिल्हा परिषदेकडून मंजुरी दिली जात आहे़ लातूर जिल्ह्यातील १०५ गावातील टंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन ११७ ठिकाणी अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ ४५ गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे़ दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असल्याने अधिग्रहणे व टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना सुरु करावी, अशी मागणी जिल्हाभरातील नागरिकांतून केली जात आहे़ (प्रतिनिधी)टंचाई निवारणासाठी ८३० वाडी-तांड्यावर १३७० उपाययोजना राबविण्यात येणार असून, यासाठी बोअर अधिग्रहण, विहिर खोलीकरण यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ७ कोटी ३० लाखाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़ या आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणाचे काम गाव पातळीवर केले जाणार असल्याचे नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी सांगितले़ ४लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात ३़४५३, माकणी ७़३०५ दलघमी, तावरजा ०़६२५, रेणापूर ३़४१८, व्हटी ०़००२, तिरू ३़३२०, देवर्जन १़६३०, साकोळ ०़९९४ तर इतर प्रकल्पामध्ये ८़८९४ असा एकूण ५८़९२८ दलघमी पाणीसाठा आहे़ एकूण पाणीसाठ्यापैकी ७़२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच असल्याचे अभियंता करपे यांनी सांगितले़