लातूर : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होेत असून नागरीकांना अनेक आडचणीला सामोरे जावे लागत आहे़ १०७ ठिकाणी अधिगृहणे करूर ११७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे तर ४५ गावांत ४६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़ तरीही पाणीप्रश्न मार्गी लागत नसल्याने अनेक पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़लातूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, अहमदपुर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर, देवणी आदी तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी २१९ गावात ३३२ ठिकाणी अधिगृहणाची मागणी करण्यात आली आहे तर १६६ गावांतील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी २०५ टँकरची मागणी करण्यात आली आहे़ टँकर व अधिग्रहणाचे प्रस्ताव मोठ्या संख्येने असतानाही पाणीटंचाईची तिव्रता लक्षात घेऊन अधिग्रहणाला व टँकरला जिल्हा परिषदेकडून मंजुरी दिली जात आहे़ लातूर जिल्ह्यातील १०५ गावातील टंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन ११७ ठिकाणी अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ ४५ गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे़ दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असल्याने अधिग्रहणे व टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना सुरु करावी, अशी मागणी जिल्हाभरातील नागरिकांतून केली जात आहे़ (प्रतिनिधी)टंचाई निवारणासाठी ८३० वाडी-तांड्यावर १३७० उपाययोजना राबविण्यात येणार असून, यासाठी बोअर अधिग्रहण, विहिर खोलीकरण यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ७ कोटी ३० लाखाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़ या आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणाचे काम गाव पातळीवर केले जाणार असल्याचे नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी सांगितले़ ४लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात ३़४५३, माकणी ७़३०५ दलघमी, तावरजा ०़६२५, रेणापूर ३़४१८, व्हटी ०़००२, तिरू ३़३२०, देवर्जन १़६३०, साकोळ ०़९९४ तर इतर प्रकल्पामध्ये ८़८९४ असा एकूण ५८़९२८ दलघमी पाणीसाठा आहे़ एकूण पाणीसाठ्यापैकी ७़२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच असल्याचे अभियंता करपे यांनी सांगितले़
११७ गावांत तिव्र पाणीटंचाई
By admin | Updated: November 22, 2015 23:42 IST